Lok Sabha Election 2024 MNS: 'नरेंद्र मोदी नसते तर..', राज ठाकरेंकडून PM मोदींचं प्रचंड कौतुक

रोहित गोळे

ADVERTISEMENT

राज ठाकरेंकडून PM मोदींचं प्रचंड कौतुक
राज ठाकरेंकडून PM मोदींचं प्रचंड कौतुक
social share
google news

Raj Thackeray praised PM Modi: मुंबई: मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी भाजप आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. ज्यानंतर सोशल मीडिया आणि जनतेतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या. असं असताना आज (13 एप्रिल) पुन्हा एकदा राज ठाकरेंनी त्यांनी पंतप्रधान मोदींना का पाठिंबा दिला याचं स्पष्टीकरण दिलं आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं. असं कौतुक राज ठाकरेंनी यावेळी केलं आहे. (lok sabha election 2024 i supported modi for this if it wasnt for him the ram mandir would not have been built mns chief raj thackeray praises pm modi)

पाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांची आज शिवतीर्थवर बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत मनसेची काय भूमिका असेल याबाबत माहिती दिली. दरम्यान, यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा का दिला याविषयीही भाष्य केलं.

'नरेंद्र मोदी नसते तर राममंदिर उभंच राहू शकलं नसतं'

'गुढी पाडवा मेळाव्यात जे मी सांगितलं.. माझ्या पक्षातील महाराष्ट्र सैनिकांना.. की, यावेळेस नरेंद्र मोदी यांना आपण पाठिंबा द्यायचं आहे. त्याचं विश्लेषण मी केलं आहे. पहिल्या पाच वर्षातील ज्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्याच्याबाबतीत जो विरोध करायचा तो विरोधही केला.' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'अनेकदा सांगतात की, राज ठाकरेंनी भूमिका बदलली. प्रश्न 2014 च्या अगोदरची भूमिका निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर भूमिका बदलू शकते तर मला असं वाटतं की, मी भूमिका बदलणं आवश्यक होतं. त्याला भूमिका बदलणं म्हणत नाही तर धोरणांवर टीका म्हणतात. त्याप्रमाणे ती टीका मी केली होती. अर्थात त्या मोबदल्यात मी काही मागितलं नव्हतं.' असं राज ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा>> LIVE : 'कावीळ झालेल्यांना जग पिवळंच दिसतं', राज ठाकरेंचा विरोधकांना टोला!

'मला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून मी टीका करतोय, माझे 40 आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय.. अशा कोणत्याही गोष्टींवरून टीका नव्हती. ती मुद्द्यांवरून टीका होती. त्यानंतर पुढील पाच वर्षात ज्या गोष्टी चांगल्या झाल्या त्याचं कौतुकही मी केलं.. जसं 370 कलम रद्द होणं, राम मंदिरसारखा इतका मोठा विषय..' 

ADVERTISEMENT

'खरं तर राम मंदिर ही गोष्ट आपल्याला काही धर्माच्या आधारावर राष्ट्र उभं नाही करायचंय. पण 1992 पासून ते 2024 पर्यंत एक रखडलेली गोष्टी ज्यामध्ये आजपर्यंत एवढ्या कारसेवकांनी आहुती दिली आहे.' 

ADVERTISEMENT

'शरयू नदीत टाकून दिलेली प्रेतं, त्यावेळी कारसेवकांना ज्या पद्धतीने गोळ्या घातल्या होत्या. मला वाटतं त्या सर्व कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील. ते राम मंदिर उभं राहिल्यावर. इतके वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न.. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असता तरी.. जर नरेंद्र मोदी नसते तर राममंदिर उभंच राहू शकलं नसतं.' 

'NRC, राममंदिर आणि 370 कलम.. असे अनेक विषय असतील.. त्याचं मी वेळोवेळी कौतुकही केलं. काही गोष्टी चांगल्या होताना दिसतात तेव्हा मला असं वाटतं की, एका बाजूला कडबोळं आणि दुसऱ्या बाजूला खंबीर नेतृत्व असेल तर पुन्हा त्यांना संधी देणं हे आवश्यक आहे असं वाटलं म्हणून आमच्या पक्षाने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.' अशा शब्दात राज ठाकरेंनी मोदींचं कौतुक केलं आहे.  

'मोदींनी सर्व राज्यांकडे एकसारखं पाहावं..'

'अर्थात महाराष्ट्रासाठी आमच्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत जातीलच.. त्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून अनेक गोष्टी आहेत. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचं संवर्धन या गोष्टी आहेत.'

हे ही वाचा>> 'मोदींच्या कार्यकाळात देशाला काय मिळालं?', संजय राऊतांचा हल्लाबोल!

'माझी अपेक्षा आहे की, सर्व राज्य ही त्यांच्या समान अपत्यासारखी पाहणं आवश्यक आहेत. गुजरात त्यांना प्रिय असणं हे स्वाभाविक आहे.. कारण ते गुजराती आहेत. पण पुढील पाच वर्ष ते याच प्रकारे इतर राज्याकडे पाहतील अशी माझी अपेक्षा आहे.' असंही राज ठाकरे म्हणाले. 

'आमच्या पदाधिकाऱ्यांना योग्य मानाने वागवावं...' 

'पुढे कशा प्रकारे त्यांची पावलं पडतात हे पाहणं आवश्यक आहे. मी त्यांना जो पाठिंबा दिला आहे त्याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची, नेत्यांची बैठक बोलावली. भाजपने, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचाय, कोणाशी बोलायचं आहे त्याबाबत यादी तयार होईल आणि नंतर ती त्यांच्याकडे जाईल.'  

'आमचे जे पदाधिकारी असतील त्यांना ते योग्य मानाने वागवतील अशी माझी अपेक्षा आहे. त्यांनी कोणाशी संपर्क साधायचा आहे ते सांगितलं जाईल. पूर्णपणे प्रचार करण्यासाठी हे मी सगळ्यांना सांगितलं आहे.'  

'प्रचार सभेबाबत मी काही ठरवलेलं नाही. मैदान बुक करणं ही फक्त एक प्रक्रिया आहे. प्रचाराबाबत मी सकारात्मक आहे. पण पुढे बघू.. सभा होईल किंवा नाही होईल हे आता सांगता येणार नाही.' असं राज ठाकरे म्हणाले.

संजय राऊतांना टोला.. 

राज ठाकरेंना भाजपने कोणती फाईल दाखवली? अशी टीका संजय राऊत यांनी केली. असा प्रश्न जेव्हा राज ठाकरेंना विचारण्यात आला त्यावर राज ठाकरे म्हणाले की, 'मी आताच माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं.. काविळ झालेली असते ना त्याला जग पिवळं दिसतं. संजय राऊत हे आताच आतून बाहेर आले आहेत. त्यामुळे त्यांचा तसा विचार असू शकतो.' असा टोला राज ठाकरेंनी यावेळी लगावला. 

'कोण पदाधिकारी.. फक्त एक मी या सगळ्या गोष्टींची विचार पक्षाचा म्हणून करत असतो. ज्यांना या प्रकारची समजच नसेल त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा असेल तो त्यांनी करावा.' असं म्हणत राज ठाकरेंनी किर्तीकुमार शिंदे यांच्या राजीनाम्यावर अधिक भाष्य करणं टाळलं.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT