BJP : "हग्रलेख आजच लिहून ठेवा", आशिष शेलार संजय राऊतांवर का संतापले?
Ashish Shelar Sanjay Raut latest Update : सामनातील अग्रलेखाला आशिष शेलाराचं प्रत्युत्तर. राऊतांना काय काय म्हणाले?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार भडकले

खासदार संजय राऊतांचा घेतला समाचार

उद्धव ठाकरेंच्या सेनेला लगावला टोला
Ashish Shelar Sanjay Raut : 'फडणवीस, बावनकुळ्यांचा भाजप महाराष्ट्रात राहील काय?', असा सवाल करत ठाकरेंच्या शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपवर टीका केली. या टीकेचा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी समाचार घेतला. (Ashish Shelar slams Sanjay Raut after he criticised chandrashekhar bawankule)
शेलार राऊतांना काय म्हणाले?
शेलार यांनी ट्विट करत संजय राऊतांवर जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले, "ही तर तुमची अखेरची घरघर! पक्ष गेला, चिन्ह गेले, खासदार, आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक गेले... जो शिल्लक गट दिसतोय ते घेऊन पत्रकार पोपटलाल जो थयथयाट करीत आहेत, तो म्हणजे त्यांच्या गटाची अखेरची घरघर", अशा उपरोधिक भाषेत शेलारांनी राऊतांना सुनावले.
"गट केवढा, आणि आवाज केवढा? पण, अखेरच्या घरघरीचा आवाज मोठाच असतो म्हणा ! 2024 नंतर महाराष्ट्रात भाजपा कुठे असेल? याची चिंता तुम्ही करु नका", असा टोलाही शेलार यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
"छोट्या मोठ्या 22 पक्षांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष म्हणजे भाजपाच आणि तुमच्या पक्षा सारख्या बांडगूळाना दिल्ली दाखवली ती सुध्दा भाजपानेच! तुमचा सडकून पराभव अटळ आहे. तुमच्या अहंकाराचा फुगा फुटणार हे निश्चित आहे. 'हग्रलेख' आजच लिहून ठेवा! तुम्ही तुमच्या गटासाठी नँनो गाडी तेवढी बुक करुन ठेवा", असे म्हणत शेलार यांनी संजय राऊतांचा खोचक शब्दांत समाचार घेतला.
हेही वाचा >> बारामतीत सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवारच?
सामना अग्रलेखातून काय करण्यात आलीये टीका?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी छोट्या पक्षांबद्दल केलेल्या विधानावर सामना अग्रलेखातून भाष्य कऱण्यात आले आहे. 'वापरा आणि फेका! बावनकुळ्यांचा पक्ष राहील काय?', असा सवाल करत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अग्रलेखातून भाजपला सुनावले. नेमकं काय म्हटलंय वाचा...