गुलाम नबी आझादांचा काँग्रेसला झटका, जम्मू-काश्मीर काँग्रेसचे 1-2 नाहीतर 51 नेते देणार पदाचा राजीनामा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे. जम्मू-काश्मीर काँग्रेसमधील नेत्यांच्या राजीनाम्यांचा धुराळा उडणार आहे. जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री माजीद वानी, मनोहर लाल शर्मा यांच्यासह 51 मोठे नेते लवकरच राजीनामा देणार आहेत. हे सर्व नेते रविवारी आझाद यांच्या नेतृत्वाखालील नव्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर आतापर्यंत 64 नेत्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे.

काँग्रेसमधून राजीनामा देणाऱ्या 51 नेत्यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री माजीद वाणी, घारू चौधरी, मनोहर लाल शर्मा, माजी आमदार बलवान सिंग, जम्मू-काश्मीर काँग्रेसचे सचिव नरिंदर शर्मा आणि सरचिटणीस गौरव मगोत्रा ​​यांचा समावेश आहे.

जम्मू-काश्मीर काँग्रेसचे हे नेते देणार राजीनामा

तारा चंद (माजी उपमुख्यमंत्री), माजिद वाणी (माजी मंत्री), बलवान सिंग (जम्मू-काँग्रेसचे सरचिटणीस), घारू चौधरी (माजी मंत्री), मनोहर लाल शर्मा (माजी मंत्री), गुलाम हैदर मलिक, विनोद शर्मा, विनोद मिश्रा, नरिंदर शर्मा, मसूद, परविंदर सिंग, आराधना अंदोत्रा, संतोष महनस, संतोष मंजोत्रा, वरुण मंगोत्रा, रेहाना अंजुम, रसपौल भारद्वाज, तीरथ सिंग, नीरज चौधरी, सरनाम सिंग, राजदेव सिंग, अशोक भगत, अश्विनी शर्मा, बद्री शर्मा, जगतार सिंग, रासपॉल भारद्वाज. सिंग, मदन लाल शर्मा, काली दास, करनैल सिंग, करण सिंग, गोविंद राम शर्मा, राम लाल भगत, केवल कृष्णा, देवेंद्र सिंग बिंदू, कुलभूषण कुमार यांच्यासह 51 जण राजीनामा देणार आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जम्मू- काश्मीरच्या आझादांची नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या गुलाम नबी आझाद यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसचा राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या नाराज नेत्यांच्या G-23 गटातही त्यांचा सहभाग होता. जी-23 गट सातत्याने काँग्रेसमध्ये अनेक बदलांची मागणी करत आहे. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आझाद यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे जाहीर केले. जम्मू-काश्मीरमध्ये नवा पक्ष स्थापन करून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गुलाम नबी आझाद यांची अशी आहे राजकीय कारकीर्द

* गुलाम नबी आझाद यांचा जन्म 7 मार्च 1949 रोजी जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे झाला. त्यांनी काश्मीर विद्यापीठातून एम.एससीचे शिक्षण घेतलेले आहे. 1970 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

ADVERTISEMENT

* 1975 मध्ये ते जम्मू-काश्मीर युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1980 मध्ये त्यांना युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले. 1980 मध्ये वाशीम, महाराष्ट्रातून त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर 1982 मध्ये त्यांना केंद्रीय मंत्री करण्यात आले. 1984 मध्येही ते याच जागेवरून विजयी झाले होते.

ADVERTISEMENT

* आझाद हे 1990-1996 पर्यंत महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार होते. नरसिंह राव यांच्या सरकारमध्येही ते मंत्रीही होते. 1996 ते 2006 या काळात ते जम्मू-काश्मीरमधून राज्यसभेत पोहोचले.

* 2005 मध्ये ते जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीही झाले. मात्र, 2008 मध्ये पीडीपीने काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर आझाद यांचे सरकार पडले.

* आझाद हे मनमोहन सिंग सरकारमध्ये आरोग्यमंत्रीही होते. 2014 मध्ये आझाद यांना राज्यसभेत विरोधी पक्षनेते बनवण्यात आले. 2015 मध्ये आझाद यांना जम्मू-काश्मीरमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT