महागाईने त्रस्त जनतेला वीज दरवाढीचा झटका! ८० ते २०० रूपये वाढणार बिल

मुंबई तक

राज्यातील महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला आता वीज दरवाढीचा शॉक मिळाला आहे. वीज नियामक आयोगाने वीज कंपन्यांना वीज बिलातून इंधन समायोजन आकार वसूल करण्याबाबत मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना वीज दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत इंधन समायोजन आकार वीज बिलात लागू केली जाणार आहे. ही दरवाढ प्रति युनिट सरासरी १ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

राज्यातील महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला आता वीज दरवाढीचा शॉक मिळाला आहे. वीज नियामक आयोगाने वीज कंपन्यांना वीज बिलातून इंधन समायोजन आकार वसूल करण्याबाबत मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना वीज दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत इंधन समायोजन आकार वीज बिलात लागू केली जाणार आहे.

ही दरवाढ प्रति युनिट सरासरी १ रूपया असणार आहे. महाराष्ट्राची जनता कोरोनातून सावरत असताना, जनतेला वाढत्या महागाईला सामोरं जावं लागलं. आता वीज बिलात वाढ होणार आहे. गॅसचे दरही नुकतेच ५० रूपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडून गेलं आहे.

जानेवारी ते एप्रिल या कालावधीत वीज खरेदीवर झालेला खर्च भरून निघावा यासाठी कंपन्यांच्या वीज बिलात ग्राहकांसाठी इंधन समायोजन आकार लागू केला जाणार आहेत. इंधन समायोजन आकारात वाढ झाल्याने अदानी इलेक्ट्रिसिटीच्या वीज ग्राहकांना प्रति युनिट सरासरी ९२ पैसे वाढ होणार आहे. टाटा पॉवर वीज ग्राहकांना प्रति युनिट १ रूपये ५ पैसे वाढ होणार आहे.

महावितरणच्या (Maharashtra Mahavitaran) इंधन समायोजन आकारात कशी वाढ?