Rain Alert : पूर्व किनारपट्टीला ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रालाही मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
मान्सून माघारी परतल्यानंतर देशातील काही राज्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूत पावसाने कहर केला असून, पुन्हा एकदा 21 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला असून, नोव्हेंबर अखेरीस (29 व 30 नोव्हेंबर) काही जिल्ह्यांत वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला […]
ADVERTISEMENT

मान्सून माघारी परतल्यानंतर देशातील काही राज्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूत पावसाने कहर केला असून, पुन्हा एकदा 21 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला असून, नोव्हेंबर अखेरीस (29 व 30 नोव्हेंबर) काही जिल्ह्यांत वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तामिळनाडूबरोबर राज्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक के.एस. होसाळीकर यांनी ट्वीट करून राज्यात 29 व 30 नोव्हेंबर रोजीच्या हवामानाची माहिती दिली.
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा परिणाम राज्यातील कोकण किनारपट्टी आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये दिसून येणार आहे. 29 नोव्हेंबर रोजी राज्यातील पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्टही देण्यात आला आहे.