Maharashtra Corona Cases: महाराष्ट्रात दिवसभरात सापडले साडे तीन हजाराहून अधिक नवे रुग्ण

मुंबई तक

मुंबई: महाराष्ट्राची (Maharashtra) चिंता अद्यापही कायम आहे. कारण मागील 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)3623 नवे रुग्ण सापडले आहेत. अद्याप महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या म्हणावी तशी नियंत्रणात आलेली नाही. महाराष्ट्र सरकारने जवळजवळ लॉकडाऊन हटवला आहे. मात्र, असं असताना कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा अद्याप कमी होत नसल्याचं दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 46 रुग्णांचा मृत्यू […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्राची (Maharashtra) चिंता अद्यापही कायम आहे. कारण मागील 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)3623 नवे रुग्ण सापडले आहेत. अद्याप महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या म्हणावी तशी नियंत्रणात आलेली नाही. महाराष्ट्र सरकारने जवळजवळ लॉकडाऊन हटवला आहे. मात्र, असं असताना कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा अद्याप कमी होत नसल्याचं दिसून येत आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 46 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,38,142 जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 3623 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील काही महिन्यात रुग्णांची आकडेवारी घटत होती. पण आता गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा 3 ते 4 हजार रुग्ण पुन्हा एकदा सापडत आहेत. राज्यातील नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात सध्या 50 हजार 400 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात 12 सप्टेंबर रोजी 3623 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 63,05,788 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.04 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 46 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.12 टक्के एवढा आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp