शरद पवारांची साथ सोडलेल्या ‘या’ मातब्बर नेत्यांचं काय झालं?, ‘या’ दिग्गजांनी गमावलीय आमदारकी

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची 2019 मध्ये ज्या-ज्या नेत्यांनी साथ सोडली होती. त्यापैकी अनेक आमदारांना आपली आमदारकीही टिकवता आली नाही. जाणून घ्या याचविषयी सविस्तर.

ADVERTISEMENT

ncp sharad pawar in 2019 many mla could not retain their MLA post
ncp sharad pawar in 2019 many mla could not retain their MLA post
social share
google news

Latest News Maharashtra Politics: मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन गट पडले. प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे अशा राष्ट्रवादीतील दिग्गज आणि विश्वासू नेत्यांनी अचानक पवारांची साथ सोडली. अजित पवारांनीही साथ सोडल्यानं पवारांना घरातच मोठा धक्का बसला. पण, याआधी 2019 ला एकामागून एक अनेक नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली होती. यामध्ये पहिल्या फळीतल्या नेत्यांचाही समावेश होता. पवारांची साथ सोडलेले हे नेते सध्या काय करतात? त्यांचं काय झालं? हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (leaders who left the ncp sharad pawar in 2019 many mla could not retain their MLA post latest news maharashtra politics)

2019 म्हणजे मोदी लाट.. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही असंच सर्वांनी गृहीत धरलं होतं किंवा सत्ताधाऱ्यांकडून तसा प्रचार सुरू करण्यात आला होता. ज्यामुळे त्यावेळी राष्ट्रवादीला बरीच गळती लागली होती आणि भाजपमध्ये इनकमिंग सुरू झालेलं. लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला भगदाड पडलं. मधुकर पिचडांसारखे स्थापनेपासूनचे बुरुज ढासळले. इतकंच काय तर राणा जगजितसिंह पाटील यासारख्या नात्यातल्या माणसांनीही साथ सोडली. पण..

पवारांची साथ सोडलेले ‘हे’ नेते सध्या काय करतात?

पवारांची साथ सोडलेल्या नेत्यांमध्ये पहिलं नाव येतं ते… मधुकर पिचड यांचं. मधुकर पिचड हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवारांसोबत होते. ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. पवारांनी त्यांना कॅबिनेट मंत्रिपदं दिली होती. अकोले मतदारसंघातून तब्बल 1980 पासून ते निवडून आले. 1999 पासून तर 2009 पर्यंत ते सलग राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार झाले. पण, 2014 ला याच मतदारसंघातून मुलगा वैभव पिचड यांना आमदार केलं. पण, 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिचड पिता-पुत्रांनी पवारांची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला.

वैभव पिचड यांना भाजपनं उमेदवारी दिली पण, त्यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवारानेच पराभव केला. इतकंच नाहीतर 28 वर्षांपासून पिचड कुटुंबाची सत्ता असलेला अगस्ती साखर कारखाना देखील त्यांच्या हातातून गेला.

हे वाचलं का?

    follow whatsapp