सुप्रीम कोर्ट निकाल: ठाकरेंना ‘ती’ एक चूक भोवली, महाराष्ट्रात शिंदेंचंच सरकार!
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल देताना आमदारांच्या अपात्रेतचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यामुळे शिंदे सरकार वाचलं आहे. पण या सगळ्यात उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा ही सर्वात मोठी चूक असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने अखेर निकाल दिला आहे. ज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यपालांनी केलेल्या अनेक कृती या घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. पण केवळ उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरं न जाता थेट राजीनामा देणं ही एक चूक त्यांना भोवल्याचं कोर्टाच्या निकालातून समोर येत आहे.
पाहा सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं आहे:
सुप्रीम कोर्टाने नबाम रेबियाचं प्रकरण हे घटनापीठाकडे पाठवलं आहे. सुप्रीम कोर्टाने राज्यपालांवर देखील ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांनी जी बहुमत चाचणी बोलावली होती ती चुकीची होती. पण उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे हे सगळं संपून जातं. राजीनामा दिल्यामुले कोश्यारींनी एकनाथ शिंदे यांना बोलावलं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची निवड बरोबर होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सरकारला काहीही धोका नाही.
कोर्टाने अपात्रेतबाबत सांगितलं आहे की, जो व्हीप नेमला जातो तो राजकीय पक्षानेच घ्यायचा असतो. त्यामुळे गोगवलेंची नेमणूक ही बेकायदेशीर होती. पण त्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. त्यामुळे आता जो व्हीप शिवसेना नेमेल तोच अधिकृत व्हीप असेल. शिवसेना म्हणजे आत्ताची शिवसेना..
यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा शिंदेंसाठी हा दिलासादायक असला तरी यावेळी कोर्टाने जे ताशेरे ओढले आहेत त्यामुळे आता शिंदे सरकारबाबत काही गंभीर सवाल उपस्थित केले जात आहेत.