भाजपशी लढायचे असेल तर विरोधी पक्षांकडे आता हा 'एकच' पर्याय
India alliance future opposition politics : दोन प्रमुख राजकीय घडामोडींमुळे विरोधकांच्या ऐक्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय आणि नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत असताना काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांच्या भवितव्यावरही चर्चा रंगली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजपशी लढायचे असेल तर विरोधी पक्षांकडे आता हा 'एकच' पर्याय
प्रादेशिक पक्षांसमोर अस्तित्वाचा प्रश्न
India alliance future opposition politics : देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या भवितव्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूला तृणमूल काँग्रेसमधील काही खासदार आणि आमदारांच्या भूमिकांबाबत चर्चा रंगत असताना दुसऱ्या बाजूला पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांच्यासोबत दीर्घ चर्चा केल्याची माहिती समोर आली. या घडामोडी सुरू असतानाच दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसच्या सहयोगी पक्षांनीच काँग्रेससमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. निवडणुकांपूर्वी अधिक प्रभावी समन्वय असावा, जागावाटपावर वेळेपूर्वी चर्चा व्हावी, तसेच नेतृत्व आणि आघाडीची दिशा स्पष्ट असावी, अशा मुद्द्यांवर विविध पक्षांनी भूमिका मांडली. या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला असून इंडिया आघाडी आता दर दोन महिन्यांनी बैठक घेणार असल्याचे निश्चित करण्यात आले.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात धो धो पाऊस कोसळणार, 'या' 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
विरोधी पक्षांकडे कोणते पर्याय?
या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि तिच्यापासून वेगळे झालेले प्रादेशिक पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात का, यावर चर्चा झाली. अनेक प्रादेशिक पक्षांची मुळे काँग्रेसमध्ये असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. महाराष्ट्रातील शरद पवार, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी आणि आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांसारखे नेते एकेकाळी काँग्रेसशी संबंधित होते, मात्र नंतर त्यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष उभारले. या सर्व पक्षांना पुन्हा एका व्यापक राजकीय चौकटीत आणल्यास काँग्रेसची ताकद वाढू शकते, असा युक्तिवाद करण्यात आला. मात्र सर्वच विरोधी पक्ष काँग्रेसमधून निर्माण झालेले नसल्यामुळे हा मार्ग सोपा नसल्याचेही नमूद करण्यात आले. समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, डाव्या पक्षांसह इतर अनेक पक्ष स्वतंत्र राजकीय ओळख जपत भाजपविरोधी भूमिका घेत असल्याने त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची आवश्यकता नाही, असेही मत व्यक्त करण्यात आले.
हेही वाचा : कल्याणमध्ये मध्यरात्री अचानक गोळीबार अन् तुफान राडा.. हादरवून टाकणारी घटना









