राष्ट्रपती निवडणूक : भाजप की काँग्रेस… ममता बॅनर्जींमुळे कुणाची चिंता वाढणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशातील सर्वोच्च पदासाठीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राष्ट्रपती पदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून, २१ जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील राजकीय पक्ष राष्ट्रपतीपदाच्या तयारीला लागले आहे. त्यातच आता ममता बॅनर्जी यांनी यात पुढाकार घेतल्यानं रंगत वाढली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ लवकरच संपणार असून, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे दिल्ली राजकीय हालचाली वाढू लागल्या आहेत. २०२४ ला लोकसभा निवडणुका होणार असून, त्यापूर्वी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यासाठी राष्ट्रपती पदाची निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.

एनडीए आणि यूपीए या दोन्ही राजकीय आघाड्यांना एकजूट आणि ताकद दाखवून देण्याची ही संधी असून, लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनेही ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राष्ट्रपती निवडणुकीबद्दल काँग्रेसकडून काय पाऊल उचललं जातं, याची प्रतिक्षा असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींनी एडीएनतील घटक पक्षांचे प्रमुख आणि विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं. ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी दिल्लीत एक बैठक बोलावली आहे.

ममता बॅनर्जी यांनी ज्या नेत्यांना बैठकीचं आमंत्रण दिलं. त्यांच्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल, सीताराम येचुरी या नेत्यांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

ममता बॅनर्जी यांनी कुणा-कुणाला पाठवलं बैठकीचं निमंत्रण?

ADVERTISEMENT

पिनराई विजयन (मुख्यमंत्री, केरळ)

नवीन पटनायक (मुख्यमंत्री, ओडिशा)

के. चंद्रशेखर राव (मुख्यमंत्री, तेलंगना)

एमके. स्टॅलिन (मुख्यमंत्री, तामिळनाडू)

उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र)

अरविंद केजरीवाल (मुख्यमंत्री, दिल्ली)

हेमंत सोरेन (मुख्यमंत्री, झारखंड)

भगवंत मान (मुख्यमंत्री, पंजाब)

सोनिया गांधी (अध्यक्ष, काँग्रेस)

लालू प्रसाद यादव (नेता, राजद)

डी. राजा (महासचिव, सीपीआय)

अखिलेश यादव (अध्यक्ष, सपा)

शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)

जयंत चौधरी (नेता, आरएलडी)

एचडी कुमारस्वामी (नेता, जेडीएस)

एचडी देवगौडा (नेता, जेडीएस)

फारुक अब्दुल्ला (नेता, नॅशनल कॉन्फरन्स)

महेबुबा मुफ्ती (नेता, पीडीपी)

सुखबीर सिंग बादल (अध्यक्ष, अकाली दल)

पवन चामलिंग (अध्यक्ष, एसडीएफ)

केएम केदार मोहिद्दीन (अध्यक्ष, आययूएमएल)

एनडीएची का वाढू शकते डोकेदुखी?

आतापर्यंतच्या स्थितीनुसार भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएला राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकण्यासाठी १० हजारांच्या जवळपास मतं कमी पडत आहे. मतांची ही तूट ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा पक्ष बीजेडी आणि जगन मोहन रेड्डी यांचा पक्ष वायएसआर काँग्रेस भरू काढू शकतात.

जगन मोहन रेड्डी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेही आहेत. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे २०१७ मध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी एनडीएचे उमेदवार असलेले रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला होता.

दरम्यान, यावेळी ममता बॅनर्जी यांनी या दोन्ही नेत्यांनाही बैठकीचं निमंत्रण पाठवलं आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष बैठकीला आले आणि ममता बॅनर्जी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांचं मन वळवण्यात यशस्वी ठरल्या, तर एनडीएची म्हणजेच भाजपची डोकेदुखी वाढू शकते.

काँग्रेसच्या चिंतेचं कारण काय?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले आहेत. तसे प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न केले होते.

त्यामुळेच राष्ट्रपती निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचं सक्रिय होणं काँग्रेससाठी चिंता वाढवणार आहे. ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेऊन सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीला बोलावलं आहे. यातून ममतांची दिल्लीतील राजकारणात येण्याची इच्छा पुन्हा एकदा दिसून येत आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांच्या कोट्याविषयी सांगायचं झालं, तर युपीएची मतं आणि एनडीएची मतं यांच्या प्रचंड तफावत आहे. त्यामुळे काँग्रेसला इतर प्रादेशिक पक्षांनाही सामावून घेण्याची गरज आहे. त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल काँग्रेस काय भूमिका घेणार, हे बघावं लागेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT