Manisha Kayande: ‘आमदारकीसाठी मी उद्धव ठाकरेंच्या मागे लागली नव्हती, त्यांनीच…’, सगळंच सांगितलं!

मुंबई तक

शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. हिंदुत्वाची भूमिका सोडल्याने आपण उद्धव ठाकरेंची साथ सोडली असं मनिषा कायंदे यावेळी म्हणाल्या.

ADVERTISEMENT

Manisha Kayande has made serious allegations against Uddhav Thackeray after joining Shiv Sena.
Manisha Kayande has made serious allegations against Uddhav Thackeray after joining Shiv Sena.
social share
google news

Political News in Maharashtra: मुंबई: शिवसेनेत (Shiv Sena) पक्षप्रवेश केल्यानंतर विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी आज (19 जून) पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) थेट आरोप केले आहेत. अनेकदा सांगूनही ठाकरेंनी भूमिका बदलली नाही. हिंदुत्वाच्या भूमिकेचा त्याग केला. बऱ्याचदा हे सहन केलं. पण डोक्यावरुन पाणी गेल्याने अधिकृत शिवसेनेत प्रवेश केला. मला उद्धव ठाकरेंनी आमदारकी दिली. पण मी काही त्यासाठी त्यांच्या मागे लागली नव्हती. असं म्हणत मनिषा कायंदे यांनी ठाकरेंवर टीका केली. (manisha kayande mlc maharashtra shiv sena uddhav thackeray cm eknath shinde hindutva political news in maharashtra)

पाहा पत्रकार परिषदेत मनिषा कायंदे नेमकं काय-काय म्हणाल्या…

‘तुमच्या मनात प्रश्न असेल की, मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत 10 वर्ष काम करत होते. विधानपरिषदेचं सदस्यत्वही त्यांनी मला दिलं. मान सन्मान दिला. परंतु असं काय घडलं की, मी आता एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. पहिले प्रथम 2012 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला तो.. म्हणजे बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत केला होता. आता देखील मी शिवसेनेतच आहे. नेतृत्वात बदल झाला आहे का? तर हो खरं आहे. अधिकृत शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.’

‘त्यामुळे मी शिवसेनेतच आहे.. पक्ष बदल तर केलेला नाही. दुसरं एकंदरच आपल्याला माहिती आहे की, माझा राजकीय प्रवास मोठा आहे.. मी भाजपमध्ये गेली अनेक वर्ष काम केलं. पण मी सुरुवातीपासूनच शिवसेनची मतदार होती. त्यामुळे शिवसेनेची जी विचारधारा आहे आणि भाजपची.. ही समसमान होती.’

‘गेली 3 वर्ष महाविकास आघाडी झाली.. 2019 ला शिवसेना भाजप एकत्र लढले आणि नंतर युती तुटली. याला अनेक कारणं आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोनाचं संकट आलं. उद्धव ठाकरे यांची आम्ही भक्कम साथ दिली. पण महाविकास आघाडीसमोर ज्या समस्या येत गेल्या अगदी विभिन्न विचारधारा.. त्या न पटण्यासारख्या होत्या.’

हे वाचलं का?

    follow whatsapp