भाजपसमोर “झुकेगा नहीं” म्हणणाऱ्या संजय राऊत यांचा ‘पुष्पा’ अंदाज चर्चेत

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यातल्या एका कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत आपला पुन्हा एकदा खास अंदाज दाखवून दिला आहे. साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांचा रोखठोक अंदाज दिसून आला. महाविकास आघाडी, ईडीच्या कारवाया, केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधले संबंध या आणि अशा विविध विषयांवर त्यांनी दिलखुलास उत्तरं दिली. भाजपसमोर झुकणार नाही असंही त्यांनी आपला पुष्पा अंदाज दाखवून देत सांगितलं.

भाजपसोबत गेला असतात तर मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षं संपली असती आता शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे संपली आहेत कसं वाटतं आहे हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा राऊत म्हणाले की आम्ही भाजपला फसवून सत्तेत आलेलो नाही. भाजपच्या वृत्तीचा आम्ही अभ्यास केला. त्यांनी शब्द पाळला नाही त्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. हा प्रयोग आता देशात यशस्वी करण्याचा आमचा मानस आहे.

“बाळासाहेबांना महाविकास आघाडीचा प्रयोग आवडला असता?” संजय राऊत आणि शरद पवार म्हणाले…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ईडीच्या धाडी फक्त भाजपच्या विरोधकांवरच का पडतात असं जेव्हा विचारलं तेव्हा संजय राऊत यांनी पुष्पा सिनेमाप्रमाणे त्यांचा झुकेगा नहीं अंदाज दाखवून दिला. २०२४ नंतर त्यांनाही कळेल. वक्त हमारा भी आयेगा. याचा त्रास होतो का? असं विचारलं तर मी म्हणेन नाही. पुष्पा मधला डायलॉग आहे ना मै झुकेगा नहीं. कोणतीही नोटीस न देता ईडी चौकशी केली गेली. मात्र ज्यावेळी माझ्या कुटुंबीयांवर धाडी पडल्या तेव्हा मी अमित शाह यांना थेट फोन केला आणि म्हटलं त्या गरीबांना त्रास देऊ नका त्यापेक्षा मला अटक करा असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं.

ADVERTISEMENT

सत्तेतले शरद पवार आणि त्याआधीचे शरद पवार यांच्यात कोणता फरक जाणवतो असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले की शरद पवार तेच आहेत त्यांच्या कोणताही बदल झालेला नाही. आम्ही तरूण असताना शरद पवारांच्या प्रेमात पडलो. जसे बाळासाहेब ठाकरे आम्ही शेवटपर्यंत तसेच होते हे पाहिलं तसेच शरद पवार आहेत. शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करत असाल तर मात्र एक आवर्जून सांगेन की बाळासाहेब ठाकरेही शेवटपर्यंत तरूणांचे नेते होते. एवढंच काय बाळासाहेब ठाकरेंना महाविकास आघाडीचा प्रयोग आवडला असता का याचंही उत्तर संजय राऊत यांनी त्यांच्या स्टाईलने दिलं आहे.

ADVERTISEMENT

बाळासाहेब ठाकरेंना हा प्रयोग नक्कीच आवडला असता. मुळात बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना असं काही करायची हिंमतच झाली नसती. बाळासाहेबांना ते चळाचळा कापायचे. मातोश्रीवर येण्याआधी दहावेळा विचार करायचे. आता परिस्थिती बदलली आहे असे नाही. फक्त आताचे शिवसेनेचे नेतृत्व टोकाचे सुसंस्कृत. पण सगळ्यांनी ही टोकाची सुसंस्कृतता पाळायची नाही. आमच्यावर बाळासाहेबांचा प्रभाव. बाळासाहेब नेहमी पवारांना म्हणायचे की आपण एकत्र आलो तर दिल्लीला झुकवू हे उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT