मोठी बातमी: बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोर तुफान राडा, हमरीतुमरी अन्…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

balasaheb memorial udhhav thackeray group eknath shinde group fight shivaji park dadar maharashtra politics
balasaheb memorial udhhav thackeray group eknath shinde group fight shivaji park dadar maharashtra politics
social share
google news

महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस्थळावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट देऊन आदरांजली व्यक्त केली. यानंतर मुख्यमंत्री माघारी परतल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोर ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठा राडा झाल्याची घटना घडली. दोन्ही गट एकमेकांच्या आंगावर आले आणि एकमेकांविरोधात गद्दार गद्दारच्या घोषणा देत आहेत. सध्या पोलीस यंत्रणा ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. (balasaheb memorial Uddhav thackeray group eknath shinde group riot shivaji park dadar maharashtra politics)

एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे निघून गेले. मुख्यंमंत्री शिंदे जाताच ठाकरे गट शिवाजी पार्कवर दाखल झाला. ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई यांच्या नेतृत्वात हे कार्यकर्ते शिवाजी पार्कवर दाखल झाले. यावेळी तिकडे उपस्थित असलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्या, नेत्यांसोबत ठाकरे गटाचा वाद झाला. आणि दोन्ही गटात तुफान राडा झाला. दोन्ही गट एकमेकांना धक्काबुक्की करून अंगावर जात होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ‘Maratha, OBC, OPEN, EWS…तू खातो तरी किती?’, जरांगेची नाव न घेता भुजबळांवर टीका

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोरच दोन्ही गट भिडले होते. यावेळी दोन्ही गट एकमेकांना धक्काबुक्की करत होते. या दरम्यान स्मृतीस्थळाचे रॉडही तुटले गेले. दोन्ही गट एकमेंकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. हाकलून द्या, हाकलून द्या, गद्दारांना हाकलून द्या, अशा घोषणा ठाकरे गट करत होता. यावेळी शिवाजी पार्कवर तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

या सर्व घडामोडींवर आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीव्ही 9 ला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत अंबादास दानवे म्हणाले, ज्यांनी शिवसेनेच्या विचाराची गद्दारी केली आहे. शिवसेना फोडण्याचे ज्यांनी पाप केले आहे. शिवसेना प्रमुखाची शिवसेना दिल्लीच्या बादशाच्या दरबारी नेऊन ठेवली आहे. त्यांना स्मृतीस्थळाला अभिवादन करण्याचा अधिकार नाही आहे. ही त्यांची नौटकी आणि नाटकबाजी असल्याची टीका दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली. तसेच हा पुर्वनियोजित राडा नव्हता आणि आमच्याकडून व्हायचं काही कारण नाही. यांनीच मुद्दाम काही केले असेल म्हणून कार्यकर्ते चवथाळल्याचे आरोप अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर केला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Sharad Pawar ‘आपण सत्तेत नसलो तरी सगळीकडे..’ शरद पवारांची नवी गुगली

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी कोणताही वाद नको, गालबोट लागायला नको म्हणून सामंजसपणाची भूमीका घेत मुख्यमंत्री पूर्वसंध्येला दर्शन घ्यायला जातात. त्यामुळे आज ठाकरे गटाने तिथे दाखल होऊन वाद घालण्याची कोणतीही गरज नव्हती.परंतु, बाळासाहेबांना आपण गमावलंय या भीतीपोटी ते कोणत्याही थराला जात आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT