एकनाथ शिंदेंचा ‘तो’ किस्सा आदित्य ठाकरेंनी सांगितला जसाचा तसा..
Mumbai Tak Baithak: एकनाथ शिंदे हे जेलमध्ये जाण्याच्या भीतीने भाजपसोबत गेले असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. याचबाबत मुंबई Tak बैठकीत त्यांनी संपूर्ण किस्सा सांगितला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गटाकडून सातत्याने वेगवेगळे आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. अशातच आता आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) CM शिंदेंनी बंड का केलं आणि कशा पद्धतीने केलं याबाबतचा नेमका किस्साच जसाच्या तसा सांगितला आहे. मुंबई Tak बैठक (Mumbai Tak Baithak) या खास कार्यक्रमात त्यांनी बोलताना नेमकं काय-काय घडलं ते सांगितलं. पाहा आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले. (eknath shinde came to varsha bungalow and cried aditya thackeray told the exact story)
‘शिंदे ‘वर्षा’वर येऊन रडले होते…’
‘मला आठवतंय की, 20 मेची तारीख होती.. साधारणपणे नोव्हेंबरमध्ये मी जेव्हा ग्लासगोला होतो तेव्हा उद्धव साहेबांची सर्जरी ठरली होती. ती सर्जरी झाल्यानंतर दुसरी सर्जरी तात्काळ करावी लागली होती. त्यानंतर पुढचा जो दीड ते दोन महिन्यांचा काळ होता उद्धव साहेब कोणाला भेटू शकत नव्हते. मी पण त्यांना भेटताना कमीतकमी 5 कोव्हिड टेस्ट करून 2-3 तासानंतर मला आत जायला मिळायचं.’
‘अर्थात मी जी ही गँग आहे त्यांना भेटायचो.. पण बाहेर येऊन कार्यक्रम करुन येत असताना उद्धव साहेबांना भेटत असताना.. उद्धव साहेबांनी प्रत्येक आठवड्यात जी काही महत्त्वाची कामं होती ती ते व्हीसीवरुन करायचे.’
अधिक वाचा- आजही मी बाळासाहेबांच्या आठवणीने भावूक होतो : नारायण राणे
‘त्यावेळी या 40 जणांचे जे गँग लीडर आहेत त्यांना वाटलं की, उद्धव साहेब परत उभे राहू शकणार नाही. किंवा पक्ष पुन्हा उभा राहू शकणार नाही. मग दिवाळीत आमदारांना जे काही द्यायचं होतं ते दिलं. हे सगळं कानावर येत होतं. हे कानावर येत असताना तरीही आम्हाला विश्वास बसत नव्हता.’