Uddhav Thackeray : “त्यासाठी सावरकर व्हा”, राहुल गांधींवर घणाघाती टीका

मुंबई तक

Shiv Sena UBT Attacks On Rahul Gandhi after criticizes savarkar : “महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांची तर सर्वात जास्त अडचण झाल्याशिवाय राहणार नाही”, असं म्हणत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

rahul gandhi statement on savarkar, Shiv Sena UBT slams congress
rahul gandhi statement on savarkar, Shiv Sena UBT slams congress
social share
google news

rahul gandhi statement on savarkar, Shiv Sena UBT slams congress : ‘माफी मागायला मी सावरकर नाहीये, तर गांधी आहे आणि गांधी कधी माफी मागत नाही,’ असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर केलं. त्यांच्या याच विधानावरून शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोंडी झालीये. राहुल गांधींनी केलेल्या विधानावरून भाजप आणि शिवसेनेने उद्धव ठाकरेंना घेरलं. त्यानंतर सामनात “त्यासाठी सावरकर व्हा” असा अग्रलेख लिहून राहुल गांधींवर घणाघाती टीका करण्यात आलीये. “राहुल गांधी वीर सावरकरांविषयी जी मानहानीकारक वक्तव्ये करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीस ओहोटी लागेल”, असा इशारा सामना अग्रलेखातून देण्यात आला आहे.

राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावर भाष्य करताना शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखात म्हटले आहे की, “राहुल गांधी वारंवार बोलत आहेत की, मी घाबरत नाही. मला तुरुंगात डांबले तरी प्रश्न विचारत राहीन. राहुल गांधी हे घाबरत नाहीत व अदानी-मोदी संबंधांवर वारंवार प्रश्न विचारीत आहेत हे खरेच, पण राहुल गांधी यांनी स्वतःबरोबरच त्यांच्या संपूर्ण पक्षाला व देशालाही निर्भय बनविण्याची गरज आहे.”

वाचा – Uddhav Thackeray : “भाजप मिंधेंच्या नेतृत्वात लढणार का? हिंमत असेल तर…” ठाकरेंनी दिलं आव्हान!

“माझे आडनाव सावरकर नाही, अशी विधाने वारंवार करून ही निर्भयता निर्माण होणार नाही व वीर सावरकर यांच्या बाबतीत जनतेच्या मनात असलेल्या श्रद्धेलाही तडा जाणार नाही. वीर सावरकर हे त्यांच्या जागी थोर आहेत. सावरकरांना अकारण ‘माफीवीर’ वगैरे दूषणे लावून लढण्याचे बळ कुणाला मिळणार नाही. ‘वीर सावरकर’ या नावात तेज आहे. अन्याय व गुलामीविरुद्ध लढण्याचे बळ आहे. वीर सावरकरांनी इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी इंग्लंड व आपल्या देशातही योद्धे निर्माण केले, त्या योद्ध्यांनी जुलमी राज्यकर्त्यांवर ‘धाडधाड’ गोळ्या चालवल्या व त्या कृत्याबद्दल सावरकरांनी कधीच खेद व्यक्त केला नाही. सावरकरांनी ज्याप्रमाणे इंग्रजांविरुद्ध अनेक योद्धे उभे केले तसे प्रखर योद्धे राहुल गांधी यांना स्वतःच्याच पक्षात आधी उभे करावे लागतील.”

“सावरकर कुटुंबाच्या त्यागाची अवहेलना कुणालाच करता येणार नाही”

“मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली हा अन्याय आहे, पण वीर सावरकरांची मानहानी करून ते ज्या सत्यासाठी लढू पाहत आहेत, त्या सत्याचा विजय होणार नाही. राहुल गांधी हे शहीदांच्याच कुटुंबात जन्मास आले व ते खरेच आहे. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य लढ्यात वडिलोपार्जित सर्वस्व पणास लावले. त्यांनी त्यांचा काळा पैसा एखाद्या अदानीत गुंतवून व्यापार केला नाही. त्यांचे जीवन देशासाठीच होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही देशासाठी सर्वोच्च बलिदान केले व त्या बलिदानाची जाणीव देशाला सदैव राहील, पण वीर सावरकर, त्यांचे बंधू बाबाराव सावरकर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने राष्ट्रासाठी तितकाच महान त्याग केला. त्या महान त्यागाची अवहेलना कुणालाच करता येणार नाही”, असं शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp