Waghya Dog controversy: 'संभाजीराजे 100 टक्के चूक बोलले', संभाजी भिडे असं का म्हणाले.. काय आहे नेमका वाद?

मुंबई तक

संभाजी भिडे यांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीबद्दल केलेल्या विधानावरून आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण संभाजीराजे हे चुकीचं बोलत आहेत असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

 संभाजी भिडे
संभाजी भिडे
social share
google news

सांगली: संभाजी भिडे यांनी बुधवारी (26 मार्च 2025) एका मुलाखतीत वाघ्या कुत्र्याच्या समाधीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "संभाजीराजे भोसले जे बोलत आहेत ते 100 टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली होती, हे सत्य आहे. या कुत्र्याची निष्ठा आणि त्याग याचा इतिहासात उल्लेख आहे. त्यामुळे या समाधीला हटवण्याची मागणी चुकीची आहे." भिडे यांनी पुढे असा दावा केला की, वाघ्या हा कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत निष्ठावान साथीदार होता आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याची समाधी रायगडावर उभारण्यात आली.

संभाजीराजे छत्रपतींनी काय केली मागणी?

या वादाला सुरुवात झाली ती संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामुळे. संभाजीराजे यांनी 24 मार्च 2025 रोजी या समाधीला ऐतिहासिक आधार नसल्याचा दावा करत ती 31 मेपर्यंत हटवण्याची मागणी केली होती. त्यांचे म्हणणे आहे की, "वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणताही उल्लेख नाही. ही समाधी काही दशकांपूर्वीच उभारली गेली असून, ती रायगडावरील एक अतिक्रमण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ अशी संरचना असणे अयोग्य आहे." त्यांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या अहवालाचा हवाला देत म्हटले की, या समाधीला कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत.

हे ही वाचा>> रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीची काय आहे कहाणी?, संभाजीराजेंच्या पत्राने खळबळ!

इतिहासकारांचे काय मत?

या मुद्द्यावर इतिहासकारांमध्येही मतभेद दिसून येत आहेत. काही इतिहासकार, जसे की श्रीमंत कोकाटे, संभाजीराजे यांच्या मताशी सहमत आहेत. कोकाटे म्हणाले, "शिवचरित्रात वाघ्या कुत्र्याचा कोणताही उल्लेख नाही. ही संकल्पना राम गणेश गडकरी यांच्या ‘राज संन्यास’ नाटकातून आली असावी, जी ऐतिहासिक नाही तर काल्पनिक आहे." 

दुसरीकडे, इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांनी संभाजीराजे यांच्या मागणीला विरोध केला आहे. ते म्हणाले, "वाघ्या कुत्र्याचा उल्लेख काही शिल्पांमध्ये आढळतो. ही समाधी हटवणे म्हणजे ऐतिहासिक संदर्भांचा अवमान आहे."

हे वाचलं का?

    follow whatsapp