‘इंडिया म्हटलं की काहींना खाज सुटते’, उद्धव ठाकरेंनी मोदींना डिवचलं, काय बोलले?
Thackeray vs Modi : इंडिया शब्दाऐवजी भारत शब्द वापरण्यास मोदी सरकारने सुरूवात केली आहे. यावरून उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना डिवचलं.
ADVERTISEMENT

– मनीष जोग, जळगाव
Uddhav Thackeray Narendra Modi : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उद्धव ठाकरेंनी नामोल्लेख टाळत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागली. मणिपूर हिंसाचार, इंडिया आघाडीवरून ठाकरेंनी मोदींना खडेबोल सुनावले. (uddhav Thackeray Attack on Narendra Modi over using bharat instead of india)
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जळगावमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी मोदींवर नाव न घेता निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, “सरदार पटेल हे दृष्टीचे नेते होते. त्यांनी त्या काळात आरएसएसवर बंदी आणली होती. त्या व्यक्तीला स्वातंत्र्य प्रेम, देशप्रेम कळत होतं. जगातील सगळ्यात उंच पुतळा कुठे उभे केला, हे तुम्हाला माहितीये. पुतळ्याची उंची ठिक आहे. कामाची उंची कधी गाठणार?”, असा सवाल ठाकरेंनी मोदींना केला.
“इंडिया म्हटलं की काहींना खाज सुटते”
विरोधकांनी इंडिया आघाडीने एनडीए विरोधात मोट बांधण्यास सुरूवात केलीये. तर दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने इंडिया ऐवजी भारत असा शब्दप्रयोग करण्यास सुरूवात केली आहे.