Ind vs Aus World Cup Final: टीम इंडिया फायनलमध्येच का हरली? 6 गोष्टी पडल्या महागात
Why India lost the 2023 World Cup : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये चांगली कामगिरी केली, पण अंतिम सामन्यात काही चुकांमुळे पराभव स्वीकारावा लागला. कोणत्या होत्या चुका?
ADVERTISEMENT

Why India lost wc 2023 : तब्बल दीड महिने सातत्यपूर्ण आणि जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वाईट अवस्था झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) खेळल्या गेलेल्या या अंतिम फेरीत कांगारूंनी भारताचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाच्या अनेक कमकुवत बाजू समोर आल्या, ज्यात सुधारणा करण्याची गरज आहे. (Why India lost the 2023 World Cup?)
भारतीय संघ या स्पर्धेत चांगला खेळला आहे, असेही क्रिकेटप्रेमींचे मत आहे. सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरी गाठली. त्यामुळे फायनलमधील पराभव हा खूप मोठा आणि महत्त्वाचा ठरतो. यातून भारतीय संघाने खूप धडा शिकायला हवा. जाणून घेऊया कुठल्या गोष्टी पडल्या महागात…
मोठ्या सामन्यासाठीची मानसिकताच नव्हती
सलग 10 सामने जिंकले, पण फायनलमध्ये परिस्थिती थोडी प्रतिकूल बनली आणि भारतीय संघाने शरणागती पत्करली. यावरून स्पष्टपणे दिसून येते की अशा मोठ्या स्पर्धा आणि मोठ्या सामन्यांना वेगळ्या स्वभावाची आवश्यकता असते. चॅम्पियनची मानसिकता आवश्यक आहे. पण भारतीय संघात याची स्पष्टपणे उणीव दिसून आली.
महत्त्वाचं >> World Cup 2027 : पुढचा विश्वचषक होणार खास! कधी, कुठे अन् किती असणार टीम… जाणून घ्या
मॅक्सवेलच्या खेळीतून घेतला नाही धडा
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची अवस्था 91 धावांवर 9 गडी बाद झालेले असतानाही विजय मिळवून दिला. त्या सामन्यात मॅक्सवेलने नाबाद द्विशतक झळकावले होते. त्यामुळे फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया जिवाची बाजी लावणार हे स्पष्टच होते. पण मॅक्सवेलच्या त्या खेळीतून भारतीय संघ काहीच शिकला नाही.