Ketan Agrawal Murder Case : लग्न जुळलं तरीही चेतनला सहा महिन्यांपासून 2004 फोन कॉल्स अन्..

मुंबई तक

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवालच्या हत्येनंतर देशभर एकच खळबळ माजली आहे. केतन हत्या प्रकरणातून आता अनेक धागेदोरे समोर येऊ लागले आहेत. केतन आणि सियाचं लग्नापूर्वी चांगली बाँडिंग तयार झाली होती, ती केतनच्या घरी ये-जा करायची, पण सर्व व्यवस्थित सुरू असताना तिचे चेतन नावाच्या तरुणाशी असंख्य फोन कॉल्स कसे सुरू होते, हे तपासाचं प्रकरण आहे.

ADVERTISEMENT

Ketan Agrawal Murder Case
Ketan Agrawal Murder Case
google news

बातम्या हायलाइट

point

सहा महिन्यांपासून चेतनला 2 हजार 4 फोन कॉल्स

point

लग्न ठरलेलं असताना दुसऱ्या तरुणाशी असंख्यदा फोन कॉल्स कशासाठी?

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवालच्या हत्येनंतर देशभर एकच खळबळ माजली आहे. केतन हत्या प्रकरणातून आता अनेक धागेदोरे समोर येऊ लागले आहेत. नुकताच वाढदिवशी मिठी मारतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.  त्या व्हिडिओत केतन आणि सिया दोघेही आनंदी दिसत आहेत, मग अचानक सियाने होणारा नवरा केतनसोबत असं हैवानी कृत्य का केलं असा प्रश्न उपस्थित होतोय. हाच विषय चर्चेचा बनला आहे. 

हे ही वाचा : कल्याण: टोमॅटोचा बहाणा, 55 वर्षीय वृद्धानं 7 वर्षीय चिमुरडीला बंद दारआड..

सहा महिन्यांपासून केतनला 2004 फोन कॉल्स

सिया गोयलने केलेल्या कृत्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्यातील एका श्रीमंत घरातील व्यवसायिक असलेल्या कुटुंबात तिचा विवाह ठरवला होता. मात्र, दुसरीकडे तपास यंत्रणांना असे काही पुरावे हाती लागले, ज्यामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. चेतन चौधरीच्या सतत संपर्कात असलेली सिया गोयलने सहा महिन्यांपासून चेतनशी 2004 फोन कॉल्स झाले होते. 

केतन अग्रवाल हे पुण्यातील एका प्रतिष्ठित व्यवसायिक कुटुंबातील होते. त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसायिक संचालक आणि मुख्य विपणन अधिकारी म्हणून कार्यरत होता. कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या सदन होते. कुटुंबियांच्या म्हणण्यांनुसार नोव्हेंबर महिन्यात मोठा विवाह सोहळ्याची तयारी करण्यात आली. कुटुंबीयांच्या मते, प्री-वेडिंग शूटपासून ते प्रत्यक्षपणे लग्नापर्यंतचे कार्यक्रम अविस्मरणीय व्हावा असे नियोजन करण्यात आले होते. तसेच एकूण 40 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. दोन्ही कुटुंबे भविष्याची स्वप्ने रंगवू लागली होती, मात्र, पोलीस तपासातून भयंकर चित्र समोर आलं. 

लग्न ठरलेलं असताना दुसऱ्या तरुणाशी असंख्यदा फोन कॉल्स कशासाठी?

पोलीस आणि स्थानिकांच्या माहितीनुसार, चेतन चौधरीचा देखील पुण्यात व्यवसाय आहे. त्याने बीबीएचे शिक्षण सुरू केलं, मात्र ते पूर्ण केलं नाही. शहरात त्याचे एक दुकानआहे. अशातच आता सियाच्या आयुष्यात नेमकं काय सुरूये याबाबत चर्चेला तोंड फुटलं आहे. लग्न ठरलेलं असताना दुसऱ्या तरुणाशी असंख्यदा फोन कॉल्स कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

हे वाचलं का?