बीड : रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

मुंबई तक

बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 10 मे रोजी अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे ही घटना घडली आहे. गावातील एका रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने हे पाऊल उचलल्याचं कळतंय. अल्पवयीन मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनंतर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 10 मे रोजी अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे ही घटना घडली आहे. गावातील एका रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने हे पाऊल उचलल्याचं कळतंय.

अल्पवयीन मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनंतर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती तर तिचे वडील राज्य परिवहन महामंडळात पालघर येथे कार्यरत होते. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घराशेजारी राहणारा अकबर बबन शेख हा तरुण वारंवार मुलीला त्रास देत होता.

नालासोपारा : सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण

कम्प्युटर क्लासला जाताना वारंवार मुलीची छेड काढणं, रस्त्यात अडवून वेडवाकडं बोलणं, सतत पाठलाग करणं असे प्रकार आरोपी अकबर शेख करत होता. पीडित मुलीने याबाबतीत आपल्या आईला कल्पना दिली होती. 6 मे च्या दिवशी मुलीच्या वडिलांनी अकबरला घरी बोलवून समज देत असा प्रकार न करण्यासाठी बजावलं होतं. परंतू यानंतरही अकबरच्या वागण्यात फरक पडला नाही, त्याने यानंतरही पीडित मुलीला त्रास देणं सुरु ठेवलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp