“धाराशिव लोकसभा मतदारसंघात 4.5 लाख मुस्लिम मतदार", अर्चना पाटील नेमकं काय म्हणाल्या?
Archana Patil : ओमराजे निंबाळकर यांच्या महायुतीतील प्रवेशाचे अर्चना पाटील यांनी स्वागत केलं. त्याच्या महायुतीत येण्याने धाराशिवच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच 2029 मध्ये महायुतीचा उमेदवार कोणताही असला तरी त्याच्या विजयासाठी काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
“धाराशिव लोकसभा मतदारसंघात 4.5 लाख मुस्लिम मतदार",
अर्चना पाटील नेमकं काय म्हणाल्या?
Archana Patil Interview, गणेश जाधव : "मी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत निश्चितपणे कुठेतरी कमी पडली असेन. मात्र, त्या निवडणुकीत लोकांनी महायुतीच्या विरोधात मतदान केलं होतं. मग तो कांद्याचा प्रश्न असो किंवा संविधान बदलाचा असो.. धाराशिव लोकसभा मतदारसंघात 4.5 लाख मुस्लिम मतदार आहेत. या मुस्लिम मतदारांनी परदेशातून दुबई वगैरेमधून येऊन मतदान केलं. पैसे वगैरे कुठलेच न काही न घेता रांगा लावून त्यांनी मतदान केलं होतं. त्यांनी आघाडीच्या ओमराजे निंबाळकरांना केलं होतं. त्यांच्यावर हा अन्याय झाला. मला डावल्यामध्ये तो मेजर विषय होता", असं धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील म्हणाल्या. त्या मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.
हेही वाचा : 20 तास काम, जनावरांचं खाद्य अन् मृत्यू, 'या' 12 कामगारांसोबत मालकाने काय केलं?
ओमराजेंच्या प्रवेशाने महायुतीचे प्राबल्य वाढणार - अर्चना पाटील
अर्चना पाटील म्हणाल्या,ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाने जिल्ह्यातील महायुतीचे प्राबल्य वाढणार आहे. त्यांचं स्वागत आहे. झालीये ती चांगली गोष्ट झालीये. आमच्यामध्ये पारंपारिक लढत आणि घराण्यांचा वाद याच्याशी लोकांना देणं-घेणं नसतं. विकास करु शकेल, असा उमेदवार लोकांना निवडून द्यायचा असतो. मी पराभूत झाले, मला लोकांनी पसंत केलं नाही. आमचा पारंपारिक वाद हा योगायोग झाला. ती केवळ दोन उमेदवारांमधील लढत होती, असंही पाटील यांनी नमूद केलं.









