मुलीने ठेवलेल्या WhatsApp स्टेट्समुळे आईला गमवावा लागला जीव

मुंबई तक

बोईसर: एका कॉलेजवयीन मुलीने WhatsApp वर स्टेट्सच्या ठेवल्याच्या वादातून पालघरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली. ज्यामध्ये मुलीच्या 48 वर्षीय आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोईसर मधील शिवाजीनगर येथे ही घटना घडली असून याप्रकरणी आता पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दोन गटामध्ये झालेल्या हाणामारीत लीलावती देवी प्रसाद या 48 […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बोईसर: एका कॉलेजवयीन मुलीने WhatsApp वर स्टेट्सच्या ठेवल्याच्या वादातून पालघरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली. ज्यामध्ये मुलीच्या 48 वर्षीय आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोईसर मधील शिवाजीनगर येथे ही घटना घडली असून याप्रकरणी आता पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

दोन गटामध्ये झालेल्या हाणामारीत लीलावती देवी प्रसाद या 48 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

प्रीती प्रसाद नावाच्या एका मुलीने WhatsApp वर काही स्टेटस ठेवले होते. ज्यावरुन दुसऱ्या मुलीला त्याचा प्रचंड राग आला. तिने त्याबाबत काही मुलांना सांगितलं. ज्यानंतर दोन तरुणांनी प्रीती प्रसादला गाठून तिच्यासोबत वाद घातला. त्यामुळे प्रीतीने थेट पोलीस स्टेशन गाठलं. पण संबंधित तरुणांवर कोणतीही कारवाई न करता पोलिसांनी त्यांना सोडून दिल्याचा दावा प्रीतीने केला आहे.

हे वाचलं का?