जुनं वैर… नवी मैत्री! चंद्रबाबू नायडूंच्या अटकेचा मेसेज काय? वाचा राजकीय Inside Story
Chandrababu Naidu Arrest : चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेचा राजकीय अर्थ काय, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी काय दिला मेसेज?
ADVERTISEMENT

Chandrababu Naidu News : टीडीपी नेते एन चंद्राबाबू नायडू 2019 पासूनच राजकीय शत्रुत्वाचे बळी ठरत आहेत. जगनमोहन रेड्डी 2019 मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यापासून नायडू, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध अनेक कारवाया झाल्या. अशा गोष्टींमुळे ते इतके दुखावले गेले की त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. (what is political significance of Chandrababu Naidu’s arrest)
सूडाचे राजकारण पहिल्यांदा बघायला मिळाले ते दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात महाराष्ट्रातही याची झलक पाहायला मिळाली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक तुम्हाला आठवत असेल.
चंद्राबाबू नायडूंना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवणं जेवढं सोपं वाटतं, तितकं सोपं आहे का? ही सुद्धा मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या दूरगामी रणनीतीची राजकीय खेळी आहे का? आणि आंध्र प्रदेशात काय चालले आहे, भाजपचे राजकारण कुठे चालले आहे? कारण नायडू यांची अटक अशा वेळी झाली, जेव्हा ते पुन्हा एनडीएमध्ये परतणार असल्याची चर्चा होती.
चंद्रबाबू नायडूंची अटक सहज नाही?
10 सप्टेंबर रोजी चंद्राबाबू नायडू यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. 1981 मध्ये नायडू आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची मुलगी भुवनेश्वरी यांचा विवाह झाला होता. असे म्हटले जाते की भुवनेश्वरीने तिचा 42 वा वाढदिवस अभिनेता भाऊ नंदामुरी बालकृष्ण यांच्या कुटुंबीयांसह तिचे चाहते आणि कामगारांसोबत साजरा करण्याची तयारी केली होती. पण एक दिवस आधी, 9 सप्टेंबर रोजी राज्याच्या CID ने माजी मुख्यमंत्री नायडू यांना अटक केली आणि आता त्यांना 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राजमुंदरी मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे.