Uddhav Thackeray: ‘…आता तुम्ही मशालीची धग अनुभवा’, ठाकरेंनी भाजपला सुनावलं

ADVERTISEMENT

Uddhav thsckeray shivsena bjp jalgaon meeting
Uddhav thsckeray shivsena bjp jalgaon meeting
social share
google news

Uddhav Thackeray: मुंबईतील इंडियाच्या बैठकीवर भाजपने निशाणा साधला होता. त्यावरून भाजप आणि शिंदे गटाला लक्ष्य करत आता जुडेगा भार, जीतेगा भारत म्हणत त्यांनी भाजपला ठाकरे शैलीत जळगावमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former cm Uddhav Thackeray) यांनी भाजपला सुनावले आहे. इंडिया (India) शब्दावरून त्यांनी केलेली टीका, इंडिया बदलून भारत करणाऱ्या भाजपला सांगताना त्यांनी सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी होय इंडियाही आमचाच, भारतही आमचाच आणि हिंदुस्थानही आमचाच असल्याचे सांगत त्यांनी भाजपला भविष्यात केंद्रातूनही आणि राज्यातूनही हद्दपार करायचे असा थेट इशाराच त्यांनी दिला.

आमची दोस्ती अजमवलीत

उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल करताना त्यांनी केंद्रावरही निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, आजपर्यंत तुम्ही आमची दोस्ती अजमवलीत आता तुम्ही मशालीची धग अनुभवा असा इशारा देत केंद्रातून आणि राज्यातूनही भाजपला हद्दपार करायचे आहे असं आवाहन त्यांनी नागरिकांनी केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी

भाजपकडून शिवसेना भवनसमोर पोस्टरबाजी करुन ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावरुनही उद्धव ठाकरे यांनी भाजपला सडेतोड उत्तर दिले. ‘मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही –हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर ठाकरे गटानेही पोस्टर बाजी करत आणि सडेतोड उत्तर देत त्यांना उत्तर दिले की, ‘मी कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना निर्माण केली नाही’ अशा शब्दात त्यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हे ही वाचा >> मुख्यमंत्रीपदाबद्दल अजित पवार म्हणाले, “वेळ कधी येईल ते सांगता येत नाही”

पण ठाकरे संपणार नाही

राज्याच्या राजकारणातून उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी भाजपने तयारी करून मला तुम्ही संपवले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात आमची ताकद आता ही केंद्रातून आणि राज्यातून भाजपला हद्दपार करण्यासाठी लावू असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे.

ADVERTISEMENT

भाजपचं हिंदुत्व थोतांड

हिंदुत्वाच्या मुद्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. स्वतःच्या राजकारणासाठी सर्जिकल स्ट्राईक करता, जवानांच्या जीवाबरोबर खेळणाऱ्या भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार घेतला. ज्या लोकांनी स्वततःच्या राजकारणासाठी देशाच्या जवानांचा वापर करतात त्यांचे हिंदुत्व हे थोतांड असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Pankja Munde:’शिवशक्ती परिक्रमा यात्रा हाणून पाडण्याचा डाव’, पंकजा मुंडेंचा स्फोटक दावा

जरांगे पाटलांना भेटायला वेळ नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठी घ्यायला वेळ आहे. मात्र ज्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण केले. त्यांना भेटायला मात्र मुख्यमंत्र्यांना भेटायला वेळ नाही म्हणत त्यांनी त्यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. यावेळी सरकारमधील कोणत्याही अधिकृत व्यक्तीने जरांगे पाटील यांची भेट न घेता त्यांचे आंदोलन संपवण्याचं काम हे सरकार करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT