विधानपरिषद निवडणूक: 'या' आकड्याने वाढवली महायुतीची धडधड, कोणाची मतं फुटणार?
Vidhan Parishad Election: विधानपरिषद निवडणुकीमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं आहे. कारण गुप्त मतदान पद्धत असल्याने आमदार फुटण्याचा धोका नक्कीच वाढला आहे.
ADVERTISEMENT

Vidhan Parishad Election: मुंबई: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुका या 12 जुलै रोजी होणार असून त्याकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण विधानपरिषदेची निवडणुकीत काय घडू शकतं हे अवघ्या राज्याने दोन वर्षांपूर्वी पाहिलं आहे. कारण 2022 साली विधानपरिषद निवडणुकीनंतरच राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं होतं त्यामुळेच आता याच 'विधानपरिषद पॅटर्नची' राज्यातील नेत्यांनाही धडकी भरली आहे. (12 candidates for 11 seats of legislative council whose mla votes will be split tension of mahayuti increased)
विधानपरिषदेच्या 11 जागा रिक्त होत आहेत. पण या 11 जागांसाठी आता 12 उमेदवार रिंगणात आहेत. जर 5 जुलैपर्यंत कुणीही आपला अर्ज मागे घेतला नाही तर निवडणूक होणं अटळ आहे. अशावेळी क्रॉस व्होटिंग होऊन मतं फुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सध्या सत्ताधाऱ्यांची चिंता काहीशी वाढली आहे.
हे ही वाचा>> Pune News : "पुरुषांनो, कुणी कसेही कपडे घातले तरी...", पुण्यात बघा काय घडलं?
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीने 9 उमेदवार दिले आहेत. तर महाविकास आघाडीने 3 उमेदवार दिले आहेत. अशावेळी कोणत्या एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागणार याविषयी अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे विधानपरिषदेतील निवडणुकीचं नेमकं गणित काय आहे हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काही आमदार हे निवडून गेले आहेत. तर काही विधानसभा सदस्यांच्या जागा या निधनामुळे रिक्त आहेत. विधानसभेतील अशा एकूण 14 जागा रिक्त असल्याने आता विधानपरिषद निवडणुकीत निवडून येण्यासाठी उमेदवाराला 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.
विधानपरिषद निवडणुकीचं नेमकं गणित कसं?
महायुतीने विधानपरिषदेसाठी 9 उमेदवार दिले आहेत. त्यापैकी भाजपने 5, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी प्रत्येकी 2-2 उमेदवार दिले आहेत.