CBSE Education: राज्यातील सर्व शाळांना CBSE अभ्यासक्रम अनिवार्य?, दादा भुसेंची मोठी घोषणा
CBSE Pattern In Maharashtra Government School : राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये लवकरच सीबीएससी अभ्यासक्रम लागू होणार आहे. सरकारने राज्य मंडळांच्या शाळांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

CBSE पॅटर्नबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली महत्त्वाची माहिती

भाजप नेते प्रसाद लाड यांच्या प्रश्नांना दादा भुसेंनी दिलं लेखी स्वरुपात उत्तर

विद्यार्थ्यांना CBSE अभ्यासक्रम अनिवार्य असणार का?
CBSE Pattern In Maharashtra Government School : राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये लवकरच सीबीएससी अभ्यासक्रम लागू होणार आहे. सरकारने राज्य मंडळांच्या शाळांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. मात्र, असं असलं तरी हा अभ्यासक्रम स्वीकारणं अनिवार्य आहे की, वैकल्पिक याबाबत अद्याप तरी सरकारच्या वतीने कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिलेली असून त्याच्या अंमलबजावणीबाबत विचार-विनिमय सुरू आहे.
राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या CBSE अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली का? असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता. त्यावर CBSE अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. या सत्राची सुरुवात 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे, अशी माहिती दादा भुसे यांनी प्रसाद लाड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
हे ही वाचा >> Nagpur Violence : दंगलीची पोस्ट, बांगलादेश ते थेट फेसबूक कंपनीशी संपर्क... नागपूर सायबरसेलनं सगळंच काढलं
भाजप नेते प्रसाद लाड यांनी विचारलेले प्रश्न
1) राज्यातील तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. जानेवारी 2025 मध्ये किंवा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय?
2) असल्यास राज्य मंडळांच्या शाळांसाठी केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसईचा) बहुतांश अभ्यासक्रम स्विकारण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय?