'त्या बेताल वक्तव्याची मुख्यमंत्री शिंदेंनी माफी मागावी', कोणी धाडली थेट नोटीस?

मुंबई तक

'महाराष्ट्रात काही अर्बन नक्सल NGOs ने इंडिया आघाडीला छुपा पाठिंबा दिला आहे’ या बेताल वक्तव्याची मुख्यमंत्री शिंदेंनी माफी मागावी अशी मागणी कायदेशीर नोटीसद्वारे करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुणे: 'महाराष्ट्रात काही अर्बन नक्सल NGOs ने इंडिया आघाडीला छुपा पाठिंबा दिला आहे’ हे विधान मुख्यमंत्री शिंदे यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे कारण निर्भय बनो लोक-चळवळीचे एक सदस्य बाळकृष्ण उर्फ बंटी निढाळकर यांनी थेट एकनाथ शिंदेंना कायदेशीर नोटीस पाठवून जर शिंदेंना महाराष्ट्रातील अनेक अर्बन नक्सल NGOs माहिती आहेत तर त्यांनी त्वरित अर्बन नक्सल असलेल्या या सगळ्या NGOs ची माहिती पोलिसांना द्यावी तसेच अशा अर्बन नक्सल सामाजिक संस्थांची यादी जनतेसमोर जाहीर करावी अशी मागणी केली आहे. (Through a legal notice, Chief Minister Shinde has been demanded to apologize for the baseless statement that 'some urban Naxal NGOs in Maharashtra have given covert support to the India Alliance'.)

बाळकृष्ण उर्फ बंटी निढाळकर यांनी अॅड. असीम सरोदे, अॅड. रमेश तारु व अॅड. संदीप लोखंडे यांच्यामार्फत पाठविलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये असेही म्हणण्यात आलेले आहे की, मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने सतत राजकीय वागणे व सतत राजकीयच वक्तव्य करणे अयोग्य आहे, हे कुणी नागरिकाने आपल्याला सांगावे याची गरज पडू नये.

हे ही वाचा>> Maharashtra Live : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

'त्या' नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय?

महाराष्ट्रात सध्या पावसाचे पाणी तुंबल्याने लोकांचे जीवन धोकादायक होणे, शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाल्याने ते आर्थिक संकटात असणे, राज्यात पेट्रोल डिझेलचे भाव शेजारच्या काही राज्यांपेक्षा वाढीव असणे, स्पर्धापरीक्षा देणाऱ्या मुलांचे प्रश्न, राज्यातील बेरोजगारीची समस्या, स्त्रिया व मुलींच्या भरदिवसा होणाऱ्या हत्या, गरीब व अक्षम लोकांना अपघातात चिरडले जाणे, खतांच्या वाढलेल्या किमती व बोगस बि-बियाण्यांचे प्रश्न, स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे,पर्यावरणाचे अनेक रखडलेले दुर्लक्षित विषय अशा अनेक समस्यांनी महाराष्ट्रातील जनतेला घेरलेले असताना तुम्ही अशा प्रश्नांवर गांभीर्याने आणि समस्यांवर उपाय काढायच्या दृष्टीने कधीच बोलतांना दिसत नाही  हे महाराष्ट्रातील लोकांना वेदना देणारे आहे.’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने बेताल वक्तव्य करणे, राजकीय स्वरूपाचे आरोपच करत राहणे यातून मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा घालविण्याचाच उपक्रम करीत आहेत असेही नमूद करण्यात आलेले आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp