‘अजित पवार चार महिन्यात तुरुंगात जाणार’, शालिनीताईंनी थेट दावाच केला
शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये मूलभूत फरक असल्याचे सांगत अजितदादांनी केलेले बंड हे स्वार्थी आणि फायद्यासाठी केले आहे. तर शरद पवारांचे बंड हे त्यांनी त्यांच्या आमदारांसाठी केले होते, तरीही अजित पवार आता चार महिन्यात तुरुंगात जातील असा दावा शालिनीताई पाटील यांनी केला आहे.
ADVERTISEMENT

Shalinitai Patil: राज्यातील राजकीय वातावरण वेगवेगळ्या मुद्यांनी ढवळून निघाले आहे. सत्तांतर, पक्ष प्रवेश अशा घटनांमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. त्यातच विरोधी पक्षनेते पदी असलेले अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis) सरकारमध्ये प्रवेश करत उपमुख्यमंत्री पदावर अजित पवार (DCM Ajit Pawar) विराजमान झाले. अजित पवारांनी भाजपसोबत जात सत्तेत सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. त्यामुळे पवार-पवार असा अंतर्गत कलहही वाढला. हा कलह वाढत असतानाच मजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Former CM Vasantdada Patil) यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनीही सत्तांतर आणि पक्षफुटीवरून अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला. त्यांच्यावर टीका करताना अजित पवार पुढच्या चार महिन्यात तुरुंगात जातील असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजी आहे. शालिनीताई पाटील यांनी त्यांच्यावर टीका करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही मोठा दावा केला आहे.
फायद्यासाठी भाजपसोबत
शालिनीताई पाटील त्यांच्या सडेतोड भूमिकेमुळे त्या सर्व राज्याला परिचित आहेतच मात्र यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत ते पुढच्या चार महिन्यात तुरुंगात जातील असा दावा केल्याने आता त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी स्वार्थी राजकारण करत स्वतःच्या फायद्यासाठी ते भाजपसोबत गेले असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला. तसेच स्वतः उपमुख्यमंत्री होण्यासाठी उतावीळ असल्याने त्यांनी भाजपला साथ दिल्याचाही त्यांनी गंभीर आरोप केला आहे.
हे ही वाचा >>मनोज जरांगेंचा भुजबळांवर पलटवार, ‘पाय तोडण्याची भाषा करणाऱ्यांनी आम्हाला…’,
स्वार्थासाठी बंड
शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका करतान ते भाजपसोबत फक्त आपल्या फायद्यासाठी गेले असल्याचे सांगत. त्यांचे आणि शरद पवारांनी केलेल्या बंडामध्ये फरक असल्याचे सांगत. शरद पवारांनी आपल्या आमदारांसाठी बंड केले होते, तर अजित पवारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.