Maratha Reservation : ”ओबीसी नेत्यांच्या राजकीय हट्टापायी…”, जरांगे पाटलांची भूजबळांवर टीका

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

maratha rerservation manoj jarange patil slams chhagan bhujbal obc protest maratha protester kunabi certificate
maratha rerservation manoj jarange patil slams chhagan bhujbal obc protest maratha protester kunabi certificate
social share
google news

Manoj jarange Patil On Chhagan Bhujbal, Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना (Manoj jarange Patil) आज रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. या डिस्चार्जनंतर मी घरी जाणार नाही, दोन दिवस विश्रांती घेऊन पुन्हा आंदोलनाला 15 डिसेंबरपासून सुरुवात करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. या आंदोलनाच्या दोन दिवसांनतरच छगन भूजबळ (chhagan Bhujbal) ,कृषीमंत्री धनंजय मुंडे, रासप नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वात जालन्यातील आंबड येथे एक मोठं आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनावर आता मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. (maratha rerservation manoj jarange patil slams chhagan bhujbal obc protest maratha protester kunabi certificate)

भुजबळ, मुंडे यांच्या आंदोलनानंतर राज्यात जरांगे (Manoj jarange Patil)  विरूद्ध ओबीसी नेते असा संघर्ष पेटणार आहे. या संघर्षावर जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही ओबीसी नेते म्हणू शकता, फक्त ओबीसी म्हणू नका. त्या बिचाऱ्यांना (ओबीसी समाजाने) काय केले आहे? ते ईमानदार आहे. मी त्यांना बरं वाटावं म्हणून असे बोलत नाही, असेही जरांगेनी सांगितले. तसेच त्यांचं आंदोलन हे आमच्या उपोषण स्थळापासून 30 ते 40 किलोमीटर दूर आहे. आम्हाला ते दिसणारही नाही इतक्या दूर असल्याचे जरांगेनी सांगितले.

हे ही वाचा : Crime News: जमिनीवर पडलेला मृतदेह, मानेवर जखमेच्या खुणा अन्… नवविवाहितेच्या सासरी नेमकं काय घडलं?

गरीब ओबीसींना आणि इतरांनाही पटलं आहे की, अनेक गरीब मराठ्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. त्यामु्ळे त्यांच्या हक्काचं त्यांना मिळत असेल तर दिले पाहिजे. ओबीसी नेत्यांनी त्यास विरोध करू नये, असे सामान्य ओबीसी, धनगर आणि मुस्लीम बांधवाना वाटते. त्यामुळे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजे, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आता मात्र ओबीसी नेत्यांनी हट्टीपणा करून वातावरण बिघडवलं नाही पाहिजे, असे सगळ्या ओबीसी बांधवांना वाटतं. याच्या राजकीय हट्टापायी सामान्य ओबीसींना वेठीस धरू नये, त्यांच्या त्यांना नोंदी मिळाल्या की गोरगरीबाला दिले पाहिजे, हेच सत्य आहे असे म्हणत जरांगेंनी भूजबळांवर टीका केली.

हे ही वाचा : Crime : क्रूरतेचा कळस! महिलेची निर्घृण हत्या करून मृतदेहासोबत ठेवले…

मराठ्यांसोबत तुम्हालाच गाठतो

राज्यातील आंदोलक मराठ्यांना मारहाणीच्या व त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरु असल्याचे जरांगे यांचे म्हणणे आहे. यावर जरांगे म्हणाले की, तुम्ही जर गोरगरीब मराठ्यांना हाणणार असाल, तर आम्ही त्या नेत्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करू. गृहमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही यात बारकाईने लक्ष घाला आणि भोकरदन मधले कोण नेते आहेत त्यांन समज द्या किंवा अटक करा, नाहीतर मराठ्यांसोबत मी तुम्हाला गाठतो. कारण चुक तुमची आहे, कायदा बिघडवायची सुरूवात तुम्हीच केलीत आम्ही नाही, असा हल्ला जरांगेनी फडणवीसांवर चढवला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT