मनोज जरांगेंच्या मनात एकनाथ शिंदेंनी फसवल्याची भावना आता का आली?

निलेश झालटे

मुंबईतील आंदोलनानंतर मनोज जरांगे यांच्या हाती थेट जीआर मिळाला. पण वाशीमध्ये फसवणूक झाल्याची भावना मनोज जरांगे यांनी बोलून दाखवली. तेव्हा नेमकं काय घडलेलं हे आपण आता जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मनोज जरांगेंचं मुंबईत आंदोलन झालं, जीआर आला आणि मराठा आंदोलक परतले. मात्र, आंदोलन सोडण्याआधी जरांगेंनी एकनाथ शिंदेंसंदर्भात केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे. एकनाथ शिंदे यांनी फसवल्याचीच भावनाच एकप्रकारे त्यांनी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ उपसमितीसमोर स्टेजवर बोलताना 'यावेळेस वाशीसारखं नको..' असं जरांगे बोलता बोलता बोलून गेले. पण या एका वाक्यामागे मोठी गोष्ट लपली आहे. यात जरांगेंना शिंदेंनी फसवलं असल्याचीच भावना एकप्रकारे बोलून दाखवली आहे.

वाशीत नेमकं काय झालेलं, जरांगे पाटील यावेळी असं का बोलले यामागचं राजकारण काय हेच आपण सविस्तर जाणून घेऊया.

फडणवीसांनी हैदराबाद गॅझेट लागू केल्यावर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. आम्ही सुरुवातीपासून सकारात्मक होतो. कायदा टिकला पाहिजे याबाबत आम्ही विचार केल्याचं जरांगेंच्या आंदोलनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मनोज जरांगे गेल्या दोन वर्षापासून लढत आहेत संवेदनशील आहेत असे एकनाथ शिंद म्हणाले. ओबीसी समाज नाराज होणार नाही, कारण त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी मुख्यमंत्री फडणवीस आणि आम्ही घेतली आहे असे शिंदे म्हणाले.

हे ही वाचा>> Maratha Reservation: 'मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी...', पाहा जरांगेंनी आंदोलन मागे घेताच CM फडणवीस काय म्हणाले

मराठा समाजावर अन्याय होऊ नये, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले खरे मात्र आंदोलनादरम्यान शिंदे नेमके कुठे होते? हा प्रश्न अनेकजण विचारत होते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp