Rashmi Shukla: मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ शुभेच्छांनी ठाकरेंची मोठी पंचाईत?

ADVERTISEMENT

Post Uddhav Thackeray personal secretary Milind Narvekar Director General of Police and Rashmi Shukla as Inspector General
Post Uddhav Thackeray personal secretary Milind Narvekar Director General of Police and Rashmi Shukla as Inspector General
social share
google news

Rashmi Shukla: राज्यातील राजकारण राम मंदिर, जितेंद्र आव्हाड आणि इंडिया आघाडीच्या अनेक मुद्यांनी आज ढवळून निघाले होते. त्यातच आज उद्धव ठाकरे यांचे पर्सनल सेक्रेटरी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या एका ट्विटमुळेही जोरदार खळबळ उडाली आहे. पोलीस महासंचालक व महानिरीक्षकपदी (DGP and IG) रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पर्सनल सेक्रेटरी मिलिंद नार्वेकर यांनी यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

फोन टॅपिंगमुळे वादात

महाविकास आघाडीच्या काळात रश्मी शुक्ला यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र केंद्राने त्यांना वाचवत त्यांची बदली इतर राज्यात केली होती. त्यावेळेपासून आणि फोन टॅपिंग प्रकरणामुळे रश्मी शुक्ला नाव चर्चेत आहेत. त्यातच आता मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या अभिनंदनाची पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याने चर्चेला उधान आले आहे.

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बेकायदेशीर दिले आदेश

शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या काळात रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चाही होऊ लागल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांनी फोन टॅप करण्याचे बेकायदेशीर आदेश दिले होते. त्यामुळे त्या प्रचंड वादात सापडल्या होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर सीएम पदावर बसलेल्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्याची शक्यता होती. त्या प्रकारामुळेच आता मिलिंद नार्वेकर यांच्या अभिनंदन आणि शुभेच्छा देणाऱ्या पोस्टमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> India Alliance : ठाकरेंचा नितीश कुमारांना फोन, म्हणाले, भाई ऐसा कैसा चलेगा…

पोस्टमुळं उलटसुलट चर्चा

रश्मी शुक्ला यांची कारकीर्दी वादग्रस्त ठरली असली आणि ठाकरे सरकारच्या काळात त्यांना अटक होणार असली तरी मिलिंद नार्वेकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यामुळे उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. ठाकरे सरकारच्या काळात त्यांच्यावर गुन्हे नोंद करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला तरी. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्यावरी खटले रद्द केले होते.

ADVERTISEMENT

नार्वेकरांची जवळीक वाढली

उद्धव ठाकरे यांचे पर्सनल सेक्रेटरी असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी शुक्ला यांचे सोशल मीडियावरून अभिनंदन केल्याने चर्चेला उधान आले आहे. नार्वेकर यांनी त्यांचे अभिनंदन केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना दूर केले आहे का असा सवालही उपस्थित केला जात आहे. कारण मिलिंद नार्वेकर यांची मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढल्याचेही शंका व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा >> Solapur: सरकारने दिली नववर्षाची भेट, पाहा सोलापूरकरांना नेमकं काय मिळालं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT