"मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची?" बँकांमधला खळखट्याक थांबणार, मनसैनिकांना काय आदेश?
Raj Thackeray Letter to MNS Workers : महाराष्ट्रभरातील मनसैनिकांनी राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी आता मनसैनिकांनी हे आंदोलन थांबवायला हरकत नाही असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज ठाकरे यांचा आंदोलनाला ब्रेक लावण्याचा सल्ला
बँकांमधला खळखट्याक थांबणार
राज ठाकरे यांनी पत्रामध्ये काय भूमिका मांडली?
Raj Thackeray Letter : "महाराष्ट्राला, मराठी माणासाला आणि मराठी भाषेला विळखा पडतोय. जर तुम्ही इथे महाराष्ट्रात मराठी येत नाही म्हणालात तर कानफाटीतच पडणार. उद्यापासून तयारीला लागा, प्रत्येक बँकेत मराठी वापरतात की नाही ते चेक करा... तयारीला लागा!" हे शब्द होते राज ठाकरे यांचे. राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पाडव्या मेळाव्याच्या सभेत हा आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर राज्यभरात मनसैनिकांनी वेगवेगळ्या बँक शाखांमध्ये मराठीचा आग्रह धरत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं. काही ठिकाणी मनसैनिकांनी मराठीला विरोध करणाऱ्यांना कानशिलातही लगावली होती. मात्र, त्यानंतर आता या आंदोलनाला ब्रेक लावण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला आहे.
महाराष्ट्रभरातील मनसैनिकांनी राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी आता मनसैनिकांनी हे आंदोलन थांबवायला हरकत नाही असं म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं?
सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन.
मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं; यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली.










