Maharashtra Politics : बच्चू कडूंचं जे झालं, तेच आता रवी राणांचंही होणार?
कॅबिनेट मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या बच्चू कडूंचे नाव या शर्यतीतून बाहेर पडलंय. आता रवी राणा यांचे काय होणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics News : बच्चू कडूंनी झगडून शिंदे-फडणवीस सरकारला दिव्यांग मंत्रालय स्थापन करायला लावलं. इतकंच नाही तर आपल्यालाच पहिला मंत्री बनवावं, अशी इच्छाही बोलून दाखवली. पण शेवटच्या क्षणी बच्चू कडूंचा गेम झाला. आता चर्चा सुरू झालीय, बच्चू कडूंचं झालं, तेच अमरावतीच्या रवी राणांचं होणार का की कडूंना मिळालं नाही, ते राणांना मिळणार?
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल दिला. त्यानंतर राज्यात चर्चा सुरू झाली ती मंत्रिमंडळ विस्ताराची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नंबर लागावा म्हणून इच्छूकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली.
बच्चू कडूंचा मंत्रिमंडळ विस्तारातून पत्ता कट
विस्ताराच्या तोंडावर सरकारी पातळीवरही घडामोडींना वेग आलाय. पण कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेण्याच्या तयारीत असलेल्या बच्चू कडूंचा ऐनवेळी गेम झाला. बच्चू कडूंना मंत्रिपदाऐवजी सध्याच्या घडीला कॅबिनेट मंत्रिपदाच्या दर्जावरच समाधान मानावं लागतंय. त्यामुळे कडूंना दुधाची तहान ताकावर भागवावी लागतेय, अशीही चर्चा होतेय.
हेही वाचा >> MNS: राज ठाकरेचं भाजपसोबतचं लव्ह-हेट रिलेशन, आतापर्यंत किती वेळा बदलली भूमिका?
दिव्यांग कल्याण विभागाचं अध्यक्षपद देऊन एकनाथ शिंदेंनी कडूंना मंत्रिपदाचा दर्जा दिलाय. त्यामुळेच आता बच्चू कडूंची नव्या कोटमध्ये कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता मावळलीय, असं म्हटलं जातंय. त्यासोबतच अमरावतीचा पालकमंत्री होण्याचाही विषय संपलाय.