Operation Sindoor मधून भारतानं नेमकं काय साध्य केलं? जाणून घ्या महत्वाचे 12 मुद्दे

मुंबई तक

ऑपरेशन सिंदूरने हा संदेश दिला की, दहशतवादाला सरकार पुरस्कृत धोरण म्हणून खपवून घेतलं जाणार नाही. तसंच भारताने नियंत्रित पद्धतीनं कारवाई करुन सामर्थ्य दाखवून दिलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑपरेशन सिंदूरमधून भारतानं काय साध्य केलं?

point

12 मुद्द्यांमध्ये समजून घ्या ऑपरेशन सिंदूरचं यश

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले केले. पहलगाममध्ये झालेल्या निष्पाप पर्यटकांवरील हल्ल्याला भारतानं आक्रमक होत उत्तर दिलं. अनेक तास दोन्ही देशांमध्ये हल्ले प्रतिहल्ले झाले. मात्र, नंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीला सहमती दर्शवली. मात्र, एकूणच या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरमधून भारतानं काय साध्य केलं असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. जागतिक स्तरावर असो किंवा काश्मीर तसंच दहशतवादाचा प्रश्न असो. भारतानं या ऑपरेशनमधून मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 

नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त

भारताने पाकिस्तान आणि PoK मधील 9 महत्त्वाचे दहशतवादी तळ नष्ट केले. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित हे तळ भारताविरुद्ध हल्ल्यांच्या नियोजनाचे  केंद्र होते.

पाकिस्तानच्या आत घुसून हल्ले

भारताने दहशतवाद्यांसोबतच  त्यांना समर्थन देणाऱ्यांवरही निशाणा साधला. हल्ले PoK पुरते मर्यादित न ठेवता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतासह शेकडो किलोमीटर आत भारताने हल्ले केले. बहावलपूरसारख्या संवेदनशील ठिकाणांवरही हल्ले झाले. तिथे अमेरिकेनंही ड्रोन हल्ले केले नव्हते. भारतानं दे दाखवून दिलं की, आम्ही ठरवल्यास सगळा पाकिस्तान आमच्या निशाण्यावर ठेवू शकतो. 
 

हे ही वाचा >> दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल आज होणार जाहीर? वेळ काय असेल, जाणून घ्या एका क्लिकवर

लाल रेषा आखली

ऑपरेशन सिंदूरने हा संदेश दिला की, दहशतवादाला सरकार पुरस्कृत धोरण म्हणून खपवून घेतलं जाणार नाही. तसंच भारताने नियंत्रित पद्धतीनं कारवाई करुन सामर्थ्य दाखवून दिलं.

दहशतवादाविरुद्ध ठोस भूमिका 

भारताने पहिल्यांदाच दहशतवादी हल्ल्याचं उत्तर थेट दहशतवादाला समर्थन देणाऱ्यांवर हल्ला करुन दिलं. पाकिस्तानमधील दुष्ट घटकांना दहशतवादी कारवायांना चिथावणी देणं आम्ही पचवून घेणार नाही दे सुद्धा दाखवलं.

पाकिस्तानच्या कमकुवत हवाई संरक्षणाचा पर्दाफाश

भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला गुंगारा देऊन ती नष्ट केली. 23 मिनिटांत अचूक हल्ले करून भारताने तंत्रज्ञान आणि रणनीतीमध्ये भारत किती समर्थ आहे हे दाखवलं.राफेल विमानांनी SCALP मिसाइल्स आणि HAMMER बॉम्ब्सचा वापर करून कोणतंही नुकसान न होता मोहीम पूर्ण केली.

हे ही वाचा >> पाकिस्तानमध्ये तब्बल 51 ठिकाणी हल्ले, बलोच आर्मीने म्हटलं आता आम्ही...

भारताच्या मजबूत हवाई संरक्षणाची ताकद

भारतानं आधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेची क्षमता दाखवली.पाकिस्तानच्या चीनी बनावटीच्या संरक्षण यंत्रणा उध्वस्त करुन दाखवली.  भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं शेकडो पाकिस्तानी ड्रोन आणि मिसाइल्स नष्ट केली. त्यामुळे आता ही संरक्षण प्रणाली जागतिक निर्यातीसाठी सज्ज झाली. 

अचूकता आणि नियंत्रित कारवाई

सैन्याने या कारवाईत फक्त दहशतवादी मालमत्ता लक्ष्य केल्या. लष्करी किंवा नागरी पायाभूत सुविधांना भारताने एअर स्ट्राईकदरम्यान धक्का लावला नाही.  

महत्त्वाच्या दहशतवाद्यांचा खात्मा

भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीतील अनेक दहशतवादी ठार झाले. एकाच रात्री अनेक दहशतवादी गटांचं नेतृत्व संपलं.

पाकिस्तानच्या लष्करी तळांना धक्का

9 आणि 10 मे च्या रात्री भारताने 11 पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केले. यामध्ये नूर खान, रफिकी, मुरिद, सुख्खुर, सियालकोट, पासरूर, चुनियन, सरगोधा, स्कारू, भोलारी आणि जकोबाबाद यां तळांचा समावेश आहे. यामुळे पाकिस्तानच्या हवाई दलाच्या 20% पायाभूत सुविधा भारतानं नष्ट केल्या. भोलारी हवाई तळावरील हल्ल्यात 50 हून अधिकजण ठार झाले. यामध्ये स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफसह 4 हवाई दलाचे सैनिक आणि अनेक लढाऊ विमाने नष्ट झाली.

तिन्ही दलांचा उत्तम समन्वय 

भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलाने एकत्रितपणे हल्ले करत, तिन्ही दलांचा समन्वय उत्तम पद्धतीनं असल्याचं सिद्ध करुन दाखवलं.

जगाला महत्वाचा संदेश 

भारत आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी कोणत्याही परवानगीची वाट पाहणार नाही, हे भारतानं दाखवून दिलं. दहशतवादाला कधीही, कुठेही शिक्षा होईल. पाकिस्तानने प्रत्युत्तर दिल्यास भारत त्याला तोंड देईल आणि आणखी कठोर कारवाई करेल हे भारताने दाखवून दिलं. 

पहिल्यांदाच, भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांना दहशतवादाच्या दृष्टीनं पाहिलं गेलं. ज्यामध्ये भारताने दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेतली.  ऑपरेशन सिंदूरने फक्त दहशतवाद्यांच्या केंद्रांवर अचूक हल्ले करत ते दाखवून दिलं. 

भारताला  जगाचं समर्थन 

पूर्वीच्या संघर्षांमध्ये, पाकिस्तानविरुद्ध काहीतरी घडलं की, बहुतेक देश भारताला संयम बाळगण्याची विनंती करायचे. मात्र यावेळी, अनेक जागतिक नेते दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईला पाठिंबा देत होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp