Virat Kohli : 'विराट' विजयानंतर कोहलीने केली मोठी घोषणा, चाहत्यांना धक्का!
Virat Kohli Retires From T20 Cricket : आयसीसी टी20 विश्वचषक जिंकल्याचा आनंद क्रिकेटप्रेमी व्यक्त करत असतानाच विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा करत चाहत्यांना धक्का दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची केली घोषणा
टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात कोहलीने केल्या 76 धावा
विराट कोहली आयपीएलमध्ये खेळत राहणार
Virat Kohli retires from T20 internationals : अखेर करोडो भारतीय क्रिकेटप्रेमींचे स्वप्न पूर्ण झाले. तब्बल तेरा वर्षांनंतर भारताने विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. श्वास रोखून ठेवायला लावणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवले आणि दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. पण, या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच विराट कोहलीने चाहत्यांना धक्का देणाऱ्या निर्णयाची घोषणा केली. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. (Virat Kohli Retired From T20Is After India's T20 World Cup won)
विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. टी20 विश्वचषक भारतीय संघाने जिंकल्यानंतर विराटने तशी घोषणा केली. अंतिम आणि भारतीय संघासाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात विराट कोहलीने जबाबदारीने फंलदाजी करत 76 धावा केल्या.
निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना विराट कोहली काय म्हणाला?
विराट कोहली 'सामनावीर'चा मानकरी ठरला. यावेळी बोलताना कोहली म्हणाला की, हा माझा शेवटचा टी20 वर्ल्ड कप आहे. एक टीम म्हणून आम्हाला विश्वचषक जिंकायचा होता. एखाद्या दिवशी तुम्ही धावा काढू शकत नाही, त्यादिवशी अशा गोष्टी घडतात. विराट म्हणाला,
ईश्वर महान आहे आणि जेव्हा गरज होती तेव्हा मी संघासाठी खेळलो. हा भारतासाठी माझा शेवटचा टी20 सामना आहे. आता नाही तर कधीच नाही. मी याचा जास्तीत जास्त फायदा घेऊ इच्छित होतो. विश्वचषक हातात घ्यायचा होता. परिस्थितीचा आदर करू इच्छित होतो.
हेही वाचा >> भारताचा ऐतिहासिक विजय, 13 वर्षानंतर जिंकला वर्ल्ड कप
आता नव्या पिढीची वेळ - विराट कोहली
विराट कोहली पुढे बोलताना असंही म्हणाला की, मी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्त होण्याची गोष्ट लपून राहिलेली नाही. आता नव्या पिढीची वेळ आहे. काही खूप चांगले खेळाडू संघाला पुढे घेऊन जातील आणि झेंडा फडकावत राहतील.










