मुंबईला Third Wave चा धोका कमी, 80 टक्के मुंबईकर कोरोना संपर्कात! वाचा काय सांगतो आहे TIFR चा अहवाल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी बसेल कारण साधारण 80 टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात येऊन गेले आहेत. असं TIFR अर्थात टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चने हा अहवाल समोर आणला आहे. दुसऱ्या लाटेचं रौद्ररूप आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. मुंबईसह महाराष्ट्राला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला आहे. अनेकांना कोरोना संसर्ग आणि मृत्यूंचं तांडवच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात पाहण्यास मिळालं. मात्र आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असताना मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Variant Of Concern म्हणजे नेमकं काय? Delta Plus ने टेन्शन का वाढवलं आहे?

या अहवालात नेमकं काय म्हटलं गेलं आहे?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोरोनाची दुसऱी लाट फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात सुरू झाली.

भारतात कोरोनच्या दुसऱ्या लाटेत दर दिवशी 4 लाखांच्या वर रूग्णसंख्या आढळत होती इतका या लाटेने उच्चांक गाठला होता

ADVERTISEMENT

मुंबईत 3 एप्रिलला सर्वाधिक 11 हजार 202 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह असल्याची नोंद दुसऱ्या लाटेत झाली.

ADVERTISEMENT

एवढंच नाही तर देशातले मृत्यूही 10 मेच्या आसपास सरासरी 4 हजार किंवा त्यापेक्षा जास्त होते जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 1100 मृत्यू सरासरी रोज यावर आले आहेत.

तिसऱ्या लाटेबाबत काय नमूद केलं आहे अहवालात?

80 टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात येऊन गेले आहे

मुंबईकरांमधली हर्ड इम्युनिटी वाढल्यामुळे तिसरी लाट आली तरीही ती फार मोठी नसेल

मात्र ज्यांना आधी कोरोना होऊन गेला आहे त्यांनाच पुन्हा कोरोना झाला तर या लाटेचं स्वरूप बदलू शकतं

Delta variant अमेरिकेसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो Dr. Fauci यांचा दावा

साधारण 80 टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात येऊन गेले असल्याची शक्यता असल्याने तिसऱ्या लाटेचा धोका मुंबईकरांना तुलनेने कमी असेल, असं टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या संशोधकांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र ह्या अभ्यासात दुसऱ्यांदा कोरोना होणाऱ्यांचा विचार करण्यात आलेला नाही. तिसऱ्या लाटेमध्ये पुन्हा कोरोना होणं हा धोका असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

भारतात कोरोनाचा शिरकाव होऊन 17 महिन्यांहूनही अधिक काळ आता लोटला आहे. त्यामुळे ज्यांना अगदी सुरुवातीला पहिल्या लाटेतच करोना होऊन गेला, त्यांच्यातल्या अँटीबॉडीज आता कमी झाल्या असतील. त्यामुळे त्यांना या तिसऱ्या लाटेचा धोका आहे, असं या संस्थेचे अभ्यासक आणि डीन डॉ. संदिप जुनेजा यांनी सांगितलं. स्थानिक प्रशासनाने पुनर्बाधितांवर लक्ष केंद्रित करायला हवं आणि लवकरात लवकर त्यांना तिसऱ्या लाटेपासून दूर कसं ठेवता येईल याचा विचार करायला हवं असंही ते म्हणाले. त्याचप्रमाणे अजूनही ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही, अशा 20 टक्के लोकांचं संपूर्ण लसीकरण लवकरात लवकर करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT