Manoj Jarange: 'आता आंदोलन करण्याची आवश्यकता नाही...', CM शिंदेंनी जरांगेंना स्पष्टच सांगून टाकलं!

रोहित गोळे

Manoj Jarange vs CM Eknath Shinde: 'सरकार प्रत्येक गोष्ट करते आहे.. मला वाटतं हे आंदोलन करण्याची आवश्यकता करण्याची गरज कोणालाही नाही..' असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री शिंदेंचा जरांगेंना इशारा
मुख्यमंत्री शिंदेंचा जरांगेंना इशारा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री शिंदे नेमकं काय म्हणाले

point

आंदोलनावरून शिंदेंचा मनोज जरांगेंना इशारा

point

CM शिंदेंनी जरांगेंना स्पष्टच सांगून टाकलं

CM Eknath Shinde Maratha Reservation: मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मनोज जरांगे यांना नियंत्रणात आणण्यासाठी शिंदे सरकार देखील अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त शब्द वापरणाऱ्या मनोज जरांगे यांच्याविरोधात SIT ची स्थापन करण्यात आलेली असताना आता पुन्हा एकदा CM शिंदेंनी मनोज जरांगे यांना आंदोलनाची काही गरज नाही असं ठणकावून सांगितलं आहे. (maratha reservation there is no need to protest now cm shinde clearly told manoj jarange)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'तुम्हाला आंदोलन करण्याची गरजच नाही...'

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (27 फेब्रुवारी) अंतरिम बजेट सादर करण्यात आलं. ज्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याचवेळी त्यांना मनोज जरांगे यांच्याशी संबंधित प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

'राज्य सरकारने मराठा जे देय आरक्षण होतं.. टिकणारं, कायद्याच्या चौकटीत टिकणारं.. ते दिलेलं आहे 10 टक्के.. कुणबी प्रमाणपत्र नोंदी ज्या जुन्या आहेत त्या देखील शोधून देण्याच काम सुरू आहे. मराठा समाजाला ज्या-ज्या सुविधा पाहिजेत त्या-त्या देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ओबीसी समाजाला धक्का न लावता इतर समाजावर अन्याय न करता.. हे आम्ही वारंवार सांगतोय.'

'सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे.. कालही स्पष्ट होती, उद्याही भूमिका स्पष्ट राहील. कारण मराठा समाजाला आतापर्यंत ज्यांना-ज्यांना संधी होती त्यांनी ती संधी दवडली. मराठा समाजाला न्याय दिला नाही.'

हे वाचलं का?

    follow whatsapp