Ravindra Waikar यांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? प्रवेशानंतर केला खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

ravindra waiker leave udhhav thackeray shiv sena what was behind the reason join eknath shinde shiv sena maharashtra politics
''खरं म्हणजे गेली 50 वर्ष शिवसेनेत काम केले आहे. 1974 ची पहिली जोगेश्वरीतील दंगल, त्या वेळेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर जे पडेल ते काम शिवसेनेचं केलं आहे.
social share
google news

Ravindra Waikar Join Eknath Shinde Shiv Sena : दिपेश त्रिपाठी, मुंबई : ठाकरे यांच्या शिवसेनेतील आमदार रवींद्र वायकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकरांचा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशाने लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान आता रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी शिंदेंच्या शिवसेनेत सामील होण्यामागचं कारण सांगितलं आहे. (ravindra waiker leave udhhav thackeray shiv sena what was behind the reason join eknath shinde shiv sena maharashtra politics) 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रवींद्र वायकर यांनी आपली भूमिका मांडली.यावेळी बोलताना रवींद्र वायकर म्हणाले की, ''खरं म्हणजे गेली 50 वर्ष शिवसेनेत काम केले आहे. 1974 ची पहिली जोगेश्वरीतील दंगल, त्या वेळेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर जे पडेल ते काम शिवसेनेचं केलं आहे. चार वेळा नगरसेवक, चार वेळा स्टँडिंग कमिटी, तीन वेळा आमदार हे पर्यायाने आल''. पण आता ज्यावेळेला मी इथे पक्षप्रवेश करतोय त्या मागचं कारण वेगळं आहे, असे रवींद्र वायकर सांगतात.

हे ही वाचा : Saroj Patil : "मी दिवसभर रडत होते, शरदचा मला फोन आला…”,

वायकर पुढे म्हणाले की, ''पहिले तर कोविड होतं त्यावेळीस कामं झाली नव्हती. पण आता जी कामे आहेत.प्रामुख्याने आरेच्या बाबतीतल पाहाल, 173 कोटी रूपये मला आरेच्या रस्त्यासाठी पाहिजेत. आरेबाबत लोकं रडत आहे की आमच्याकडे 45 किमीचे रस्ते होणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रॉयल पंप सारख्या परिसरात अत्यंत उत्तम पाण्याची व्यवस्था परिपूर्ण नाही. अशावेळेला धोरणात्मक निर्णय लोकांसाठी बदलणं महत्वाचं असतं. असे धोरणात्मक निर्णय बदलले नाहीत तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकत नाही'', असे वायकर यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

माझ्या येथे पीएमजीबी कॉलनी आहे. या कॉलनीसाठी मी पत्रव्यवहार करायचो. त्या 17 बिल्डिंग पडल्या तर मग काय करायचं? हा मोठा प्रश्न आहे.सर्वोदय नगरचा प्रश्न आहे. एनडी झोनचा प्रश्न आहे. धोरणात्मक निर्णय हे सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाही. सत्तेत असताना आपण धोरणात्मक निर्णय सोडवले तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकतो, असेही वायकर म्हणाले आहेत.

हे ही वाचा : सुप्रिया सुळेंची मागणी, अजित पवारांचं लगेच उत्तर; फडणवीसांसमोर काय घडलं?

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. ते चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं काम सूरू आहे. माझ्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी इथे आलो आहे. हे प्रश्न सोडवले नाहीत तर मी लोकांसमोर जाऊ शकत नाही, अशी भूमिका रवींद्र वायकर यांनी मांडली. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT