Chavadi Impact: संजय राऊत म्हणाले शिवसेना शाहांनी फोडली, गृहमंत्री म्हणाले सेना तर…

मुंबई तक

ADVERTISEMENT

sanjay raut shiv sena split mumbai tak chavadi amit shah nanded bjp eknath shinde uddhav thackeray
sanjay raut shiv sena split mumbai tak chavadi amit shah nanded bjp eknath shinde uddhav thackeray
social share
google news

मुंबई: शिवसेना (UBT) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काल (9 जून) मुंबई Tak च्या चावडीवर बोलताना थेट आरोप केला होता की, शिवेसना हा पक्ष शिंदेंनी फोडला हे सफेद झूट आहे.. हा पक्ष अमित शाह यांनी फोडला. राऊतांनी चावडीवर केलेल्या याच आरोपाला आज (10 जून) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमधील एका जाहीर सभेत बोलताना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. (sanjay raut shiv sena split mumbai tak chavadi amit shah nanded bjp eknath shinde uddhav thackeray)

अमित शाह म्हणाले, शिवसेना मी नाही फोडली, तर…

‘उद्धवजी म्हणतात.. आम्ही यांचं सरकार आम्ही तोडलं.. आम्ही नाही सरकार पाडलं.. उद्धवजी शिवसैनिक आपल्या.. शिवसेनेच्या नीतीविरोधी गोष्टींमुळे वैतागून शरद पवारांच्या पक्षासोबत राहायला तयार नव्हते.. म्हणून त्यांनी तुमचा पक्ष सोडला.. त्यामुळे तुमचं सरकार पडलं. दगा करण्याचं काम, धोका देण्याचं काम उद्धव ठाकरेने केलं होतं. मोदींच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणूक लढली आणि मुख्यमंत्री बनण्यासाठी ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले.’ असं म्हणत अमित शाहांना सर्वात आधी संजय राऊतांचे आरोप तर फेटाळून लावलेच. पण पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर बोचऱ्या शब्दात टीका देखील केली.

हे ही वाचा >> ‘शिंदेंमध्ये शिवसेना फोडण्याची ताकदच नव्हती, शाहा आता त्यांना नष्ट करतील’

चावडीवर संजय राऊत काय म्हणालेले?

‘आता हे शिंदे वैगरे लोकं गेले आहेत… 40 लोकं हे काय भाजपमध्ये टिकणार नाहीत. त्यांना काय टिकू देणार नाही. हे भाजपातच गेले आहेत.. दुसरे कुठे गेले आहेत. हा पक्ष शिंदेंनी फोडलाय हे सफेद झूट आहे. शिवसेना हा पक्ष अमित शाहांनी फोडलाय. हा पक्ष भाजपने फोडलाय.. हा त्यांनी सूड घेतलाय. त्यांनी सत्तेचा गैरवापर केला आहे. यांच्यात काय ताकद होती?’ असा अत्यंत गंभीर आरोप संजय राऊत यांनी मुंबई Tak च्या चावडीवर बोलताना केला होता.

संजय राऊतांची अमित शाहांवर घणाघाती टीका

‘शिवसेनेसारखा पक्ष फोडणं.. आणि शिवसेना पक्ष फोडून महाराष्ट्र कमजोर करणं.. मुंबईवर शिवसेनेची आणि पर्यायाने मराठी माणसाची असलेली पकड ही ढिली करणं हे गेल्या अनेक वर्षापासून भाजपचं स्वप्नं होतं आणि आहे.. ते करायचं असेल तर आधी शिवसेना फोडली पाहिजे. शिवसेना अशी फुटू शकत नाही. एकनाथ शिंदे आणि 5-6 लोकांचा गेल्या काही काळापासून प्रयत्न सुरू होता. पण त्यांची ताकद 5-6 आमदारांच्या पुढे नसावी. त्यामुळे जे चित्र नंतर निर्माण झालं ते चित्र निर्माण करण्यात भाजपचं दिल्लीचं नेतृत्व, गृह मंत्रालय.. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून निर्माण झालेला दबाव.. यामुळे हा पक्ष फोडण्यात आला. नाही तर इतक्या मोठ्या संख्येने आमदार गेले.. त्यातील 12-12 आमदारांवर तर खटलेच चालू होते.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> “2014 नंतर भाजपसोबत युतीला माझा विरोध होता”, संजय राऊतांचा ‘राजकीय बॉम्ब’

‘अनेक खासदारांवर विविध प्रकारचे खटले चालू होते. या सगळ्यांचा वापर करून अमित शाह यांच्या माध्यमातून हा पक्ष फोडण्यात आला. कारण त्यांना महाराष्ट्रातून शिवसेना कमजोर करणं.. आपण पाहा.. वारंवार मुंबईवर ताबा घेऊ, मुंबईचा ताबा घेऊ.. सुरू झालंय. मुंबईचा ताबा घेण्यासाठी, मराठी माणसाचं वर्चस्व नष्ट करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर.. धमक्या, पैसा हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं राजकारण आहे. पण ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही. हे मी वारंवार सांगत राहिलोय.’

‘बघा त्यानंतर ज्या घटना घडत गेल्या.. महाराष्ट्रातील गुंतवणूक बाहेर जायला लागली. उद्योग बाहेर लागले.. महाराष्ट्राचा आवाज दिल्ली आणि सर्वत्र दाबण्याचा प्रयत्न झाला. हे सगळं गेल्या वर्षभरात झालं. एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा ईडीच्या माध्यमातूनच दबाव आला. हे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यांच्यासमोर शिंदे कसे रडले हे मलाही माहिती आहे. आम्ही अनेकदा चर्चा केली.. आमचं म्हणणं होतं की, आपण खंबीर राहिलं पाहिजे. आपलं मन खंबीर ठेवलं पाहिजे. हे ही दिवस निघून जातील.. घाबरून चालणार नाही. पण हे लोकं घाबरले.. आता मोठा आव आणतायेत.. डरकाळ्या फोडतायेत.. पण त्या पोकळ गर्जना आहेत. भविष्यात भाजप यांना नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. ती सुरुवात झाली आहे. कारण त्यांना कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राचा आवाज उठवणारा पक्ष किंवा संघटना राज्यात नकोय.’ अशी टीका देखील संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT