NCP: ‘माझा सल्ला शरद पवारांना पचनी नाही पडला तर..,’ उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
Uddhav Thackeray: मी दिलेला सल्ला शरद पवारांना पचनी नाही पडला तर? अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना दिली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: ‘शरद पवार यांना मी कसा सल्ला देणार? तो त्यांच्या पक्षाचा अतंर्गत विषय आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी दिलेला सल्ला पवारांना पचनी नाही पडला तर काय करु?’ असा मिश्किल सवाल शिवेसना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज (4 एप्रिल) पत्रकार परिषद बोलावली होती. त्याचवेळी त्यांना शरद पवारांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत (Sharad Pawar Resignation) विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी आपला सल्ला त्यांच्या पचनी पडणार नाही असं म्हटलं आहे. (what if sharad pawar doesnt digest my advice why did uddhav thackeray say )
शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वतुर्ळात बराच गदारोळ पाहायला मिळत आहे. याचबाबत आज उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.
पाहा शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले:
‘मला असं वाटतं की, प्रत्येक पक्षामध्ये काही बदल करण्याचा अधिकार त्यांच्या अध्यक्षाला असतात. अद्यापही तिथे निर्णयाप्रत कोणीही आलेलं नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय होऊ द्या. मग काय बोलायचं ते मी बोलेन. पण महाविकास आघाडीला तडा जाईल अशी कोणतीही गोष्ट राष्ट्रवादीत घडेल असं मला वाटत नाही.’
हे ही वाचा >> Shalini Patil : “सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करा, अजित पवारांना अटक होऊ शकते”
‘आता प्रत्येकाला आत्मचरित्र लिहण्याचा अधिकार असतो. पण मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे जगजाहीर आहे. म्हणूनच मला वाटतं की, महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्याच कुटुंबातील एक सदस्य वाटतो. मला असं वाटतं की, या पलिकडे मी याबाबत काही बोलणं योग्य नाही.’