कोश्यारींबद्दल अजित पवार थेट बोलले, ‘राज्यपालांना थांबायचं नसेल…’

मुंबई तक

भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटण्याची चिन्ह आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबद्दल स्पष्टपणे या विषयावर भाष्य केलं असून, भाजपला कोंडीत पकडलंय. अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांसह भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी केलीये. अजित पवार म्हणाले, ‘आम्ही राज्यपालांविरोधात हल्लाबोल महामोर्चा काढला होता. राज्यपालांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटण्याची चिन्ह आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबद्दल स्पष्टपणे या विषयावर भाष्य केलं असून, भाजपला कोंडीत पकडलंय.

अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांसह भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी केलीये. अजित पवार म्हणाले, ‘आम्ही राज्यपालांविरोधात हल्लाबोल महामोर्चा काढला होता. राज्यपालांना पदावरून हटवा आणि तिथे दुसऱ्या कुणाला बसवा अशी आमची मागणी आहे.’

‘राज्यपालपदी कोणत्या व्यक्तीला बसवावं हा केंद्राचा अधिकार आहे. एक-दोन वेळा चूक समजू शकतो. हे सातत्याने होत आहे. चुकून काही घडत नाही. अनेकजण हसत हसत विधाने करत आहेत,’ असं म्हणत अजित पवारांनी भाजपला लक्ष्य केलं.

‘रामदास स्वामींचं उदाहरण देताना छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीने उल्लेख केला जातो, ते पटणारं नाही. महाराष्ट्र कधीही हे सहन करणार नाही. राज्यकर्ते कुणीही असले, तरी सत्तेवर येण्यासाठी शिवाजी महाराजांचंच नाव घेतात. महाराजांचा चेहरा दाखवूनच आम्ही त्या मार्गाने जाणार असल्याचं सांगतात,’ असं म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला.

हे वाचलं का?

    follow whatsapp