'मी पण मेलो असतो तर बरं झालं असतं...', कुटुंबातील 10 जण ठार झाल्यावर दहशतवादी मसूद अझहरला 'हे' सुचलं
Masood Azhar: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील तब्बल 10 सदस्य ठार झाले आहेत. या हल्ल्यानंतर, दुःखी मसूद अझहर म्हणाला की 'या हल्ल्यात मी पण मेलो असतो तर बरं झालं असतं.'
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 सदस्य ठार झाले आहेत. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याने स्वतः याची पुष्टी केली आणि सांगितले की, भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील 10 सदस्य आणि चार जवळचे सहकारी मारले गेले आहेत.
या हल्ल्यानंतर, मसूद अझहर म्हणाला की, 'या हल्ल्यात मी पण मारला गेला असता तर बरे झाले असते.' जैश-ए-मोहम्मदने एका निवेदनात म्हटले आहे की, "मौलाना कशफ यांचे संपूर्ण कुटुंब, मौलाना मसूद अझहर यांच्या मोठ्या बहिणीसह मारले गेले आहे आणि मुफ्ती अब्दुल रौफ याची नातवंडे, बाजी सादिया हिचा पती आणि त्याच्या मोठ्या मुलीची चार मुले जखमी झाली आहेत. बहुतेक महिला आणि मुले मारली गेली आहेत."
हे ही वाचा>> निष्पापांचे बळी घेणाऱ्या मसूद अजहरचं संपूर्ण कुटुंब ठार, Air Strike मध्ये कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू
हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अझहरच्या कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्या व्यक्तींना आज दफन करण्यात येईल.
आज (7 मे) मध्यरात्रीच्या सुमारास भारतीय सशस्त्र दलांनी पंजाबमधील जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला असलेल्या वहावलपूरसह नऊ दहशतवादी अड्ड्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला. पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, 'भारताची कारवाई केंद्रित, जबाबदारपणे आणि चिथावणीखोर नव्हती.' ते म्हणाले की, पहलगाम हल्ला अत्यंत क्रूर होता.