Tanaji Sawant: अजित पवारांचं नाव घेताच तानाजी सावंतांना उलट्या का होतात? Inside स्टोरी

निलेश झालटे

CM एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या एका विधानाने ते सध्या बरेच चर्चेत आहेत. जाणून याबाबतची संपूर्ण स्टोरी

ADVERTISEMENT

तानाजी सावंत असं का म्हणाले?
तानाजी सावंत असं का म्हणाले?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तानाजी सावंत पुन्हा एकदा आले चर्चेत

point

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत तानाजी सावंत असं का बोलले?

point

विधानसभा निवडणुकीआधी तानाजी सावंतांनी का केलं 'ते' विधान?

धाराशिव: जनरली सामान्य माणसांना उलट्या होण्याआधी मळमळ होते. मळमळ होत असल्याचं लक्षात येताच माणूस उलट्या करतो. आता आरोग्यमंत्री असलेल्या तानाजी सावंतांच्या उलट्यांचा विषय मोक्कार गाजतोय. सावंतांच्या महायुतीमध्ये उलट्या होण्याची सुरुवात तशी लोकसभा निवडणुकीपासूनच झालीय. धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ओमराजे निंबाळकरांनी महायुतीच्या अर्चना पाटलांचा तब्बल 3,30,790 मतांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. या लीडमध्ये 80 हजारांहून जास्तीचा लीड हा तानाजी सावंतांच्या मतदारसंघातून मिळाला आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता आरोग्यमंत्र्यांना उलट्या होण्याचं हेच कारण आहे का? तर नाही.. (why does tanaji sawant vomit at the mention of ajit pawar name inside story mahayuti politics)

ते काय आहे हे पुढे आपण बघणारच आहोत. मात्र महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्हीकडे लोकसभेनंतर आता जसजसी विधानसभा जवळ येतेय तशा अनेक ठिकाणच्या कुरबुरी चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. यात लोकसभेलाही सावंत आघाडीवर होते आणि आताही ते आघाडीवर दिसत आहेत. सावंतांच्या या उलट्या नव्या नाहीत. त्यांच्या या उलट्यांमागे बरीच कारणंही आहेत. याबाबतच आपण जाणून घेणार आहोत.

तानाजी सावंत यांच्या टीकेमागचं नेमकं राजकारण काय?

आधी सावंतांनी काय म्हटलंय बघा...  'मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझं जमलेलं नाही. शिक्षण घेत असल्यापासून आत्तापर्यंत कधीही यांच्याशी जमलं नाही. हे वास्तव आहे. आज जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलोय पण बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही,' या विधानानंतर आता दादांचे नेते सावंतांवर सडकून टीका करायला मैदानात उतरलेत. कोणत्याही युतीमध्ये भडका उडायला या छोट्या छोट्या ठिणग्या पुरेशा आहेत असं विश्लेषक सांगत असतात.

हे ही वाचा>> Sindhudurga: शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्यासाठी शिंदे सरकारचा नवा जीआर जसाच्या तसा..

तानाजी सावंत म्हणजे सतत चर्चेत असणारे नेते....शिवाय एकनाथ शिंदेंच्या मर्जीतले.. खेकड्यामुळं धरणं पडलं, हाफकीन संस्था, मराठा आरक्षण, अजब दौरे, अधिकाऱ्यांसोबतचे वाद अशा एक ना अनेक गोष्टींनी चर्चेत येणारे तानाजी सावंत सध्या त्यांना होत असलेल्या उलट्यांमुळं चर्चेत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp