‘उद्धव ठाकरेंना पुन्हा आरोग्यावरुन डिवचलं’, देवेंद्र फडणवीस म्हणाले; तुम्हाला तर..

मुंबई तक

ADVERTISEMENT

bjp dcm devendra fadnavis criticized shiv sena ubt uddhav thackeray adversely affected needs psychiatrist
bjp dcm devendra fadnavis criticized shiv sena ubt uddhav thackeray adversely affected needs psychiatrist
social share
google news

Latest News Of Maharashtra Politics: मुंबई: शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (10 जुलै) उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. ‘देवेंद्र फडणवीस हे नागपूरवर कलंक आहेत.’ अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये बोलताना केली होती. त्यावर फडणवीसांनी कालच आपल्या ट्विटर अकाउंटवरुन अनेक उदाहरणं देत उद्धव ठाकरेंना ‘कलंकिचा काविळ’ असं म्हणत पलटवार केला होता. ज्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज (11 जुलै) पुन्हा पत्रकार परिषद घेत फडणवीस हे कलंकच असल्याचा पुनरुच्चार केला आहे. ज्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचं म्हणत डिवचलं आहे. (bjp dcm devendra fadnavis criticized shiv sena ubt uddhav thackeray adversely affected needs psychiatrist news on maharashtra politics)

‘उद्धव ठाकरेंवर विपरित परिणाम झालाय, मानसोपचार तज्ज्ञांची गरज..’

‘उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर खरं म्हणजे मला या गोष्टीचं अत्यंत दु:ख आहे की, आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र उद्धव ठाकरे यांच्यावर आताच्या राजकीय परिस्थितीवर फारच विपरित परिणाम झालेला दिसतोय. त्यामुळे कदाचित त्यांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल अशी परिस्थिती याठिकाणी पाहायला मिळतं आहे. त्यामुळे असा मानसिकतेतून एखादा व्यक्ती बोलत असेल तर मला असं वाटतं की, त्यावर प्रतिक्रिया देणंही योग्य नाही. ही मानसिक स्थिती आहे ती सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. त्यावर प्रतिक्रिया न दिलेली बरी.’ अशा बोचऱ्या शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांना डिवचलं!

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘त्याचं एवढं लागण्यासारखं काय, ज्यांना माझा शब्द लागला. त्यांना मला विचारायचं की, तुम्ही दुसऱ्यांवर भ्रष्टाचार आरोप करता तेव्हा तुम्ही कलंक लावत नाही का? तू भ्रष्ट आहेस, तुझं कुटुंब भ्रष्ट आहे, तो भ्रष्टाचाराचा कलंक तुम्ही लावत नाही का?’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘हसन मुश्रीफांच्या पत्नीने रस्त्यावर येऊन आक्रोश केला होता. अशा धाडी टाकण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून ठार करा. मग तेच मुश्रीफ त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. आम्हाला जे बोलत होते की, बाळासाहेबांना अटक करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात. मला आज कळलं की यांनाही मांडी आहे. तुम्ही म्हणाल तो माणूस भ्रष्ट आणि तुम्ही त्याला मंत्रिमंडळात स्थानही देता. मग तो भ्रष्ट आहे की, देव आहे? तुम्ही म्हणाल तो भ्रष्ट आणि तुम्ही म्हणाल तो देव, हे कुठलं हिंदुत्व?’

हे ही वाचा >> ‘बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसात उद्धव ठाकरे त्यांना…’, नितेश राणेंचा खळबळ उडवणारा राजकीय बॉम्ब

‘भ्रष्टाचाराचे आरोप करून त्या माणसांना त्यांच्या कुटुंबांना कलंकित करता. पुन्हा मंत्रिमंडळात घेता. मग ते भ्रष्टाचाराचे आरोप खोटे होते का? मग भ्रष्टाचाराचा कलंक का लावला? माझ्या बोलण्यामुळे कळलं की त्यांनाही थोडं मन आहे.’

ADVERTISEMENT

‘नितीन गडकरींना सुद्धा या अनुभवातून जावं लागलं आहे. कुणाला काही बोलण्याबद्दल मला गमंत वाटतं नाही. पूर्वी मी अफजल खानाची स्वारी असं बोललो होतो. बोलण्याचा हेतू हा होता की, हे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय घराघरांत घुसवताहेत. म्हणजे याचा अर्थ तोच आहे की सामील व्हा, नाहीतर कुटुंबासकट कापून टाकू. ईडी, सीबीआय घरात घुसवल्यानंतर ते कुटुंब कलंकित होत नाही का? तुम्हाला फक्त जाणीव करून दिली, तर तळपायाची आग मस्तकात जाण्याचं कारण काय?’

ADVERTISEMENT

‘लोकमान्य टिळक पुरस्कार नरेंद्र मोदींना जाहीर झाला. कुणाच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे, शरद पवारांच्या. मग 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचं काय झालं? व्यासपीठावर कोण कोण असणार आहे? मला काही तारतम्यच कळलं नाही. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असा प्रश्न कुणाला विचारायचं? ज्यांच्यावर तुम्ही 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. तो पक्ष आता तुमच्यासोबत आला आहे. शरद पवार तुमच्यासोबत व्यासपीठावर असणार, आमच्यातील मिंधे तुमच्यासोबत असणार, मग लोकांनी बघायचं काय? कोण कुणाला कलंक लावतंय’

हे ही वाचा >>  602 मध्ये ऑफिस नको रे बाबा!; अजित पवारच अंधश्रेद्धेचे ‘बळी’, प्रकरण काय?

‘माझं ऑपरेशन झालं. त्यावरून माझी चेष्टा करतात. माझ्या कमरेचा पट्टा सुटला, कुणाच्या गळ्याचा पट्टा सुटला म्हणून चेष्टा करतात. मी असं करत नाही. बोलत नाही. मी जे भोगलं, ते त्यांना भोगावं लागू नये, अशी माझी प्रार्थना आहे. ज्या दिवशी ते भोगतील, त्या दिवशी त्यांना कळेल की ती शस्त्रक्रिया काय आहे. इथपर्यंत तुम्ही खाली जाता. माझं म्हणणं आहे की, ही लोक महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेतच.’

‘मी काय चुकीची भाषा वापरली? कलंकचा अर्थ काय होतो? त्यात अर्वाच्य असं काय आहे? ऑपरेशनवरून माझी मजाक उडवताहेत, हे चालतं का? ती कोणती संस्कृती आहे.’

’25 वर्ष सोबत राहिल्यानंतर असं काय घडलं होतं की, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी हिंदूच होतो. आजही हिंदूच आहे. तुम्ही म्हणाल, तो दगड. तुम्ही म्हणाल, तो भ्रष्ट. तुम्ही म्हणाल, तो डाकू. तुम्ही म्हणाल तो देव. तुम्ही म्हणाल, तो संत. पण, तुम्ही जे म्हणाल, ते ऐकायचं असे तुम्ही आहात कोण? पूर्वी बाळासाहेबांकडे एकदा गोड बाबा आले होते. ते ढिगभर मिरच्या खायचे आणि त्या मिरच्या त्यांना गोड लागायच्या. यांनाही (भाजप) मिरच्या गोड लागत आहेत.’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT