महिलेसोबत 'तसल्या' अवस्थेत शेजाऱ्याला दिसला, अन् आयुष्याचा शेवट झाला, नेमकं काय घडलं?
kanpur farmer murder : कानपूरमधील शेतकऱ्याच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. सुरुवातीला संशयित ठरलेले तीन मित्र निर्दोष ठरले असून शेजारी शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिलेसोबत 'तसल्या' अवस्थेत शेजाऱ्याला दिसला
अन् आयुष्याचा शेवट झाला, नेमकं काय घडलं?
Crime News : एका शेतकऱ्याच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे. हाठी गावात ट्यूबवेलवर झालेल्या दारू पार्टीच्या रात्रीनंतर शेतकरी हरमोहन यादव यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला या प्रकरणात मृताच्या अर्जुन, मुलायम आणि श्याम या तीन मित्रांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. मात्र त्यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगत नव्याने तपास करण्याची मागणी केली होती.
दुखापतीच्या खुणा दिसल्याने संशय बळावला
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसीपी आशुतोष सिंह यांनी नव्याने तपास सुरू केला. तपासादरम्यान गावातील एका तरुणाने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. घटनेच्या रात्री शेजारच्या शेताचा मालक धर्मेंद्र यादव गायब असल्याचे तसेच दुसऱ्या दिवशी त्याच्या हातावर दुखापतीच्या खुणा असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हरमोहन यांच्या अंत्ययात्रेत आणि स्मशानभूमीपर्यंत धर्मेंद्र उपस्थित होता, त्यामुळे त्याच्यावर कोणालाही संशय आला नाही. मात्र दुसऱ्याच दिवशी तो आपल्या कुटुंबासह सासरी निघून गेल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. तपासात असेही उघड झाले की, काही दिवसांपूर्वी हरमोहन यांनी धर्मेंद्रवर 900 रुपये चोरी केल्याचा आरोप करत त्याचा फावडा आणि कुदळ उचलून नेली होती.
हेही वाचा : 'तुम्ही विद्यार्थ्यांची माफी मागा', लाठीचार्जवरुन राहुल गांधी पीएम मोदींवर भडकले










