"गुजरातहून बस आणून महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न"; संजय राऊत संतापले!
Team India Victory Parade Bus : टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडसाठी "बेस्टच्या ताफ्यात अशी बस असतानाही गुजरातहून बस का आणली?" असा सवाल करत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न...

"...पण हे जास्त दिवस चालणार नाही"

मुंबईत सर्व काही आहे... इथूनच लूट होते अन् गुजरातला जाते
Sanjay Raut On Team India Victory Parade Bus : T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची गुरूवारी मरीन ड्राइव्ह ते वानखेडे अशी व्हिक्ट्री परेड काढण्यात आली. आता या मिरवणुकीवरून राजकीय वर्तुळात टीका-टिप्पण्या सुरू झाल्या आहेत. व्हिक्ट्री परेडसाठी "बेस्टच्या ताफ्यात अशी बस असतानाही गुजरातहून बस का आणली?" असा सवाल करत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. (shivsena ubt sanjay raut on team india open deck bus for victory parade which brought from gujrat)
टीम इंडियाचे खेळाडू T20 विश्वचषक जिंकल्यानंतर गुरूवारी भारतात आले. दिल्ली आणि मुंबईत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुंबईत तर खेळाडूंसाठी चाहत्यांनी अलोट गर्दी केली होती. तसंच त्यांच्या व्हिक्ट्री परेडसाठी ओपन बसची तयारी करण्यात आली होती. पण ही बस गुजरातची असल्याचे त्याच्या नंबर प्लेटवरून उघड झाले. मग काय? विरोधकांनी या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधायला सुरूवात केली.
हेही वाचा : Team India च्या व्हिक्ट्री परेडमध्ये घडलं तरी काय? 10 जण रूग्णालयात दाखल
महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न...
शिवसेना नेते संजय राऊत यांनीही यावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, "बेस्टच्या ताफ्यात अशा प्रकारच्या बस आहेत. जर नसती तर ती एका रात्रीत बनवून घेतली असती एवढी क्षमता मुंबईत आहे. पण काल वापरलेल्या बसमुळे महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. मुंबईत सर्व काही असताना तुम्हाला गुजरातमधून या गोष्टी का आणाव्या लागतात?" असा प्रश्नही यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.
"...पण हे जास्त दिवस चालणार नाही"
"याआधीही वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय टीम जेव्हा मुंबईत आली होती तेव्हाही बस, गाड्यांचा वापर जल्लोषासाठी केला जात होता. पण काल वापरलेल्या बसमुळे महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. संपूर्ण देशात सर्व काही गुजरात आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. गुजरात आहे म्हणून देश आहे, हे दाखवण्याचा सतत प्रयत्न सुरु आहे. पण हे जास्त दिवस चालणार नाही.