‘..तर भाजपला दोष देऊन काय उपयोग? याची गरज नव्हती’, श्रीनिवास पवार रोहित अन् जय पवारांबाबत काय म्हणाले?

मुंबई तक

Shriniwas Pawar on Jay Pawar and Rohit Pawar : बारामती विधानसभेच्या 2029 च्या निवडणुकीबाबत आमदार रोहित पवार आणि जय पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत श्रीनिवास पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात..

ADVERTISEMENT

Rohit Pawar and Jay Pawar
Rohit Pawar and Jay Pawar
google news

बातम्या हायलाइट

point

‘..तर भाजपला दोष देऊन काय उपयोग? याची गरज नव्हती’,

point

श्रीनिवास पवार रोहित अन् जय पवारांबाबत काय म्हणाले?

Shriniwas Pawar on Jay Pawar and Rohit Pawar, बारामती  :  अजित पवारांच्या मृत्यूनंतर होत असलेल्या बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी आज (दि.23) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, मतदान सुरु असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलंय. "बारामतीमधून 2029 मध्ये मी निवडणूक लढावी, अशी बारामतीकरांची इच्छा आहे. पण माझ्या मनात आहे की, मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच पुढे काम चालू ठेवावं आणि सर्वांना मदत करावी." असं जय पवार म्हणाले आहेत. तर जय पवारांच्या या वक्तव्याला प्रत्युतर देताना रोहित पवार म्हणाले की, "2029 मध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. मात्र, पवार विरुद्ध पवार हा संघर्ष लोकांना नकोय. तो भाजपला हवाय. "

दरम्यान, रोहित पवार आणि जय पवार यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत श्रीनिवास पवार यांनी भाष्य केलंय. ते बारामती येथे 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा : "तुला घरात घुसून मारु, पानसरेंना भेटायला वर जा", संजय गायकवाडांकडून शिवीगाळ अन् मारहाणीची भाषा

दोघांनीही या क्षणाला काही बोलण्याची गरज नव्हती : श्रीनिवास पवार 

श्रीनिवास पवार म्हणाले, जर तुम्हाला माहिती आहे की, पवार विरुद्ध पवार असा संघर्ष लोकांना नको वाटतोय. तर मग पवारांनी समजूतीने घ्यायला हरकत नाही. यामध्ये भाजपला दोष देऊन काय उपयोग आहे? तुम्हाला जर कळत असेल की कोणीतरी काहीतरी चुकीचं करायला बघत आहे. तरीपण तुम्ही आता अशा प्रकारची वक्तव्य करत आहात. हे चुकीचं आहे. दोघांनीही या क्षणाला काही बोलण्याची गरज नव्हती. आज महत्त्वाचा दिवस आहे. आज आपण सर्वजण होऊन दादांसाठी हे सगळं करत आहोत. कोणीही विरोधात उभा राहिलेलं नाही. मला वाटतं आता त्या गोष्टींची गरज नव्हती. 

हे वाचलं का?